राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीर

विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जबाबदारीची जाणीव होते – पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

प्रतिनिधी-अक्षय काळे 

 

कोपरगाव – मोबाईलचा अतिरिक्त वापर व सोशल मीडियाचा अतिरेक यामुळे तरुण भरकटत चालला आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. यामुळे हिम्मत व जिद्द वाढते. ज्ञानाची कक्षा वाढते. जबाबदारीची जाणीव होण्याच्या दृष्टीनेच विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शिर्डी उपविभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पोहेगांव येथील हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

 

 

यावेळी हिंदुहृदयसम्राट मान.बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाचे संस्थापक, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, प्राचार्य शांतीलाल जावळे, सरपंच जयाताई माळी, उपसरपंच आनंदा भडांगे, गोपीनाथ कोल्हे, महाविद्यालयाचे प्रा.रविंद्र गायकवाड, प्रा. दिपक वाघमारे, प्राध्यापिका भावना गांधीले, प्रा. श्री भांड, श्री रोहमारे, प्राध्यापिका श्रीमती शोधक,सांगले एन पी,सुभाष भडांगे, सुभाष जुन्धारे, महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाविद्यालय संस्थापक नितीनराव औताडे यांनी सांगितले की सहकार महर्षी कै गणपतराव रभाजी औताडे यांनी ब्रिटिशांच्या काळामध्ये सहकाराचं रोपट लावलं , कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची उभारणी केली , दिन दुबळ्यांना आधार दिला. त्यांचीच सामाजिक कामाची परंपरा पुढे सुरू राहावी म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाची स्थापना केली. नूतन इमारतीचे काम सुरू असून (CBSC) ते 12 वी परवानगी मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे परिसरातील मुलींना वमुलींना उच्च शिक्षण घेता आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

प्राचार्य शांतीलाल जावळे यांनी वेस सोयगाव येथे सलग तीन वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने विशेष श्रम शिबिराचे आयोजन करत आहेत यामुळे गावच्या विकासाला हातभार लागला आहे.वेस सोयगावच्या दोन प्रमुख रस्त्यावर शिवसेना नेते नितीनराव औताडे यांच्या पुढाकारातून वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रा.बी.एस.गांधीले यांनी केले तर आभार डी एस वाघमारे यांनी मानले.

 

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!