
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
न्यूज एडिट बाय-प्रवीण दरंदले
राहाता – चितळी (ता.राहाता) येथील रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे कामास मागील एक-दीड वर्षांपूर्वी सुरूवात करण्यात आली.नुकतेच रेल्वे स्थानकात समोरच्या बाजूच्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम झाले आहे स्थानकात दादर उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकांना पुन्हा पुनर्जीवित करण्याचा केंद्र सरकारचा उदान्त हेतु आहे.पुढील काळात रेल्वे पटऱ्यांचे चौपदरीकरणही होणार आहे.स्टेशनचा परिसर विस्तृत होणार आहे चितळी सारख्या ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशनची दशा सुधारणार आहे स्टेशनचे सुशोभीकरण करून रुपडे पालटणार आहे विस्तारिकरणामुळे स्टेशनच्या वैभवात अजूनही भर पडेल स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मितीसाठी मदत होईल मागील एक-दीड वर्षांपासून स्टेशनच्या नूतन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे.चितळी रेल्वे स्थानकाच्या परिसरात मध्य रेल्वे प्रशासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देवून विस्तारीकरणाचे काम येत्या काहीच महिन्यात पुर्ण होण्याचे संकेत मध्य रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.नगर-दौड रेल्वे मार्गांवरील महत्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या बेलापूर-पुणतांबा रेल्वे स्थानकपासून चितळी रेल्वे स्थानक काहीच अंतरावर आहे.
चितळी रेल्वे स्टेशनच्या विस्तारिकरणाच्या कामामुळे प्रवाश्यांचा आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहे परंतु स्टेशनल भविष्यात एवढ्या सुविधा मिळणार आहेत तरी याठिकाणी पॅसेंजर रेल्वे थांबत नसल्याने आताच्या स्थितीत चितळी रेल्वे स्टेशनचा प्रवासी वर्गापासून जणू संपर्कच तुटला असून पॅसेंजर रेल्वे थांबत नाही अत्यंत वाजवी दरामध्ये प्रवासाचे साधन म्हणजे रेल्वे मानले जाते तरी सर्वसामान्य प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होत नाही जवळील स्टेशनवर रेल्वे थांबत नाही यामुळे स्थानकावरील प्रवाश्यांची गर्दी नेहमीप्रमाणे पाहायला मिळत नाही या कारणास्तव अनेक रेल्वे स्टेशने सध्या प्रवाश्यांचा गर्दीपासुन अलिप्त झालेले पाहायला मिळत आहे.अशी स्थिती असताना देखील केंद्र सरकारने ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकांच्या विकासाचे धोरण सत्यात आणले आहे ‘इतिहास जमा’ होत असलेल्या अनेक रेल्वे स्थानकांना पायाभूत सुविधा देवून विविध रेल्वे स्थानकांची सुधारणा करण्याचे कार्य सुरू केले आहे.
चितळी रेल्वे स्थानकाचा कायापालट येत्या काहीच महिन्यात होणार!
भविष्यकाळामध्ये चितळी या ठिकाणी पॅसेंजर रेल्वे थांबू शकतात असा विचार नाकारता येवू शकत नाही.चितळी रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण झाल्यावर याठिकाणी अधिकृत पॅसेंजर रेल्वेला हिरवा कंदील दिला पाहिजे अशी आस सर्वसामान्य प्रवासीवर्ग व नागरिकांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे ठेवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करून सुरु आहे येत्या काही महिन्यातच स्टेशनच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल!
चितळी रेल्वे स्थानकात पुन्हा पॅसेंजर थांबणार का..? प्रवाशांचा व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न
येथे पुन्हा प्रवाशांसाठी नव्याने टिकीट खिडकी उघडू शकेल का? पॅसेंजर रेल्वे थांबेल का? या प्रश्नावर अजूनही मध्य रेल्वे प्रशासनाने शिक्कामोर्तब केला नाही. तरीही संभाव्यपणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारिकारणाचे काम गतीशीलपणे सुरु आहे याठिकाणी पुन्हा पहिल्यासारखी पॅसेंजर रेल्वे थांबणार असल्याचे संकेत दिसत आहे.परंतु मागील तीन ते चार वर्षाच्या कालावधीपासुन या ठिकाणी कुठल्याही पॅसेंजर गाड्या थांबत नसल्याने प्रवासी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे निदान एकतरी पॅसेंजर गाडी थांबली पाहिजे अशी स्थानिकांची व प्रवाशांची कळकळीची मागणी आहे अनेक वर्षांपासून नागरिकांच्या नजरा मात्र पॅसेंजर रेल्वे कधी थांबेल याकडे सर्व प्रवासी वर्गाचे लक्ष टिकून आहे.
विस्तारिकरण करा पण,पॅसेंजर रेल्वेला थांबायला परवानगी द्या..!
रेल्वे हे सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणासाठीचे मुख्य साधन मानले जाते परंतु, २०२० सालापासून चितळी सारख्या ग्रामीण भागातील गरजेच्या ठिकाणी रेल्वे थांबत नसल्याने मागील चार ते पाच वर्षापासून नागरिकांमध्ये तीव्र नाराजगीचे सुर उमटले आहेत,पुणतांबे जंक्शनच्या ठिकाणी ही कोरोना काळापासून असेच हाल पाहायला मिळाले होते,पुन्हा रेल्वेला अधिकृत थांबा मिळावा यासाठी १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘ऐतिहासिक रेल रोको आंदोलन’ छेडले यात आसपासच्या तब्ब्ल दहा गावांतील हजारो नागरिकांनी एकी दाखवून ‘ऐतिहासिक रेलरोको’ आंदोलन यशस्वी करून दाखवले या आंदोलना पुढे रेल्वे प्रशासनासह केंद्र सरकारला झूकावे लागले ग्रामीण भागातील प्रवाश्यांचा मागण्या लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी,महाराष्ट्र एक्सप्रेस,अमरावती एक्सप्रेस, डेमो आदी रेल्वे गाड्यांना थांबायला परवानगी मिळाली आहे.यामुळे पुणतांबे रेल्वे स्थानक पुन्हा एकदा नव्या जोमाने पुनर्जीवित झाले आहे परंतु जळवळील चितळी रेल्वे स्थानक रेल्वे थांबण्याच्या प्रतीक्षेत आहे.चितळी रेल्वे स्थानकात पॅसेंजर रेल्वे थांबवून मध्य रेल्वे प्रशासनाने अशीच नवंसंजीवनी देण्याची मागणी होत आहे.
