धार्मिकसामाजिक

खून का बदला खून केल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही – सागर बेग

पुणे-सोलापूर बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

इंदापूर- महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जिहादींचे मोठ्याप्रमाणात अतिक्रमण होतंय आणि हिंदूंना ४२ अंश तापमानात तप्त रस्त्यावर बसून आंदोलन करावे लागते यासारखे दुर्दैव्य नाही.दिवसेंदिवस जिहादी आपल्या हालचाली वाढवत आहेत आता खून का बदला खून केल्याशिवाय ही लढाई थांबणार नसल्याचे खंबीर प्रतिपादन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केले आहे.

 

इंदापूर येथे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या प्राचीन गढीभोवती व रामवेशी जवळील वक्फ बोर्डाने केलेले अतिक्रमण शासनाने याअगोदर आश्वासन देऊनही काढलेली नाही त्याच्या निषेधार्थ पुणे-सोलापूर बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला त्याप्रसंगी सागर बेग हे बोलत होते.याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते.

 

पहलगाम याठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याचा प्रथम निषेध करत सागर बेग पुढे म्हणाले की,पुरोगामी विचारसरणीच्या पुढाऱ्यांमुळे इंदापूर येथील काही हिंदू हा षंढ झालेला आहे.महाराजांच्या आजोबांच्या समाधीजवळ वक्फ बोर्डाचे अतिक्रमण होत असताना आंदोलन स्थळी खूप कमी संख्येने लोकं उपस्थित असल्याची नाराजी व्यक्त करत ते म्हणाले की,शासनाने आता ऐकले तर ठिक नाहीतर पुढील आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात शिवप्रेमी घेऊन करण्याचा इशारा बेग यांनी दिला.ते पुढे म्हणाले की,अशा पुरोगाम्यांच्या काळातच जिहाद्यांनी महाराजांच्या गडकिल्ल्यांवरच मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्याचे धाडस केलेले आहे.थडग्यांवर हिरव्या चादरी चढवणाऱ्यांमध्ये हिंदूच जास्त आहे अशा थडग्यांवर बोकड कापणारे सुद्धा हिंदूच जास्त आहे अशा अनिष्ट प्रथा हिंदू धर्मात नाही ज्या हिंदूंना थडग्यातील हिरव्या चादरी खाली झोपलेल्यांसाठी बळी द्यावयाचा असेल त्याने डुकरांचा बळी द्यावा तो चादरी खाली झोपलेला तरी तेथून पळून जाईल कारण जिहाद्यांमध्ये डुकराला निषिद्ध मानलेले आहे.पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत बेग म्हणाले की,आता खून का बदला खून असा पावित्रा हिंदूंना घ्यायची वेळ आली आहे.

 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत पुरोगाम्यांच्या बालेकिल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर झालेल्या अतिक्रमणास स्थानिक राजकारण्यांचा छुपा आशीर्वाद असल्याचा स्पष्ट आरोप केला.मुंबईत बारा बाँबस्फोट झालेले असताना तेरावा सांगणाऱ्यांच्या काळात जिहादी जास्त पोसले बॉलिवूड मध्ये खान वाढले आणि तेथूनच लावजिहाद सारख्या अपप्रवृत्तींना बळकटी मिळाल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला.

 

 भर उन्हात तब्बल अडीच तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनात आंदोलक आक्रमक होत जोपर्यंत समाधी स्थळाजवळील बांधकाम थांबवण्यात येत नाही व रामवेशी जवळील अतिक्रमण बाबत शासन ठोस असा लेखी निर्णय देत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने प्रशासनाची काहीकाळ धांदल उडाल्याचे चित्र आंदोलनस्थळी बघावयास मिळत होती.इंदापूरचे तहसीलदार यांनी केलेल्या मध्यस्थीने कोणताही मार्ग न निघाल्याने थेट जिल्हाधिकारी यांच्याशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनद्वारे संपर्क करत व ते संभाषण माईकद्वारे आंदोलकांना ऐकवण्यात आले त्यानेही समाधान न झाल्याने प्रचंड घोषणाबाजीने तप्त वातावरणात आंदोलक चांगलेच पेटल्याने आमदार पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे थेट संपर्क करून मुख्यमंत्र्यांनी फोनवरून समाधी स्थळाजवळील बांधकाम तातडीने थांबवण्याचे आदेश देऊन अतिक्रमण देखील काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ही आंदोलकांनी तहसीलदार यांच्याकडून लेखी घेतल्याशिवाय महामार्ग सोडला नाही.तहसीलदार यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!