
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी-वैभव ताजणे
आश्वी –आश्वी.बु (ता संगमनेर ) परिसरात मागील अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार लोकांना बघण्यास मिळत आहे.असे असले तरी वनविभागाकडुन या परिसरामध्ये गस्त घालत पिजरा लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.नुकताच येथील इरीगेशन रोड ताजणे मळा येथील अरूण बाबुराव गायकवाड यांच्या येते बिबट्याने शेळीवर हल्ला केला होता.
ही घटना ताजी असतानाच इरिगेशन रोड व्ही.एम गांधी फनिर्चर शेजारी असलेल्या तौफिक शेख यांच्या चिकन शॉप पर्यत तो भक्षाच्या धोखात असतांना सी सी टिव्ही मध्ये रात्री बिबट्या कैद झाला आहे. बिबट्याने मटन कापण्याचा टेबल तसेच कोंबड्याचे ठेवण्याच्या पिजऱ्यांचा वास घेताना तो दिसतो. सी सी टिव्ही मध्ये बिबट्या पुढे जाताना दिसतो तर पुढे जात तो पुन्हा मागे वळून कुठे कोबड्या दिसतात को याचा शोध घेताना दिसला.सातत्याने बिबट्या या परिसरामध्ये दिसत असुन आश्वी बु परीसरातील नागरीक पहाटे इरीगेशन रोड ते प्रतापपुर पर्यत फिरायला जात आसतात जर भरवस्तीत बिबट्याच्यावावरामुळे नागरीकाच्या जिवितास धोका असुन या बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार रविद्र बालोटे, अनिस शेख,हरीभाऊ ताजणे,आनंद बालोटे,मुकेश वर्प आदी ग्रामस्थांनी केली आहे.
आश्वी बुद्रुक,प्रतापपुर,पिंप्री लौकी अजमपुर या परिसरामध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असुन भविष्यामध्ये बिबट्या माणसावर आक्रमण करण्याचा धोका वढत चालला असुन या परीसराती मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य असल्यामुळे येथील बिबट्याची गनणा करण्याची मागणी अनुलोम मित्र वैभव ताजणे यांनी केली आहे.
