प्रशासकीय

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी कालवा लाभक्षेत्रात वळवा – विठ्ठलराव शेळके

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – गोदावरी कालवा लाभक्षेत्रात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवन्याची मागणी शेतकरी संघटनेने नुकतीच केली असून याविषयी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका निवेदनाद्वारे संबंधित विभागाकडे केली आहे.

 

निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे की ब्रिटिश सरकारने गेली शंभर वर्षा पूर्वी नगर नाशीक जिल्हे दुष्काळी भागात धरणे बांधली पुढे आपल्या सरकारने शेतीचे असलेले ब्लॉक बंद करून शेतीचे पाणी कारखाने व शहरात दिले २००५ साली चुकीचा कायदा करून लाभक्षेत्रातील शेतकरी बंधू भगिनींना यांचा अधिकार काढून मराठवाडा येथे मोठे दारू निर्माण करणारे कारखानदार यांना दिले गेली.

 

वीस वर्षापासून घाट माथ्यावरील वाहून जाणारे पाणी वळून असे निवडणुकीत आम्हाला सागितले जात आहे .शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली याचे काम चालू झाल्याने पाटबंधारे विभाग कार्यालय व जलसंपदा विभाग कार्यालयाचे अभियंता जाधव साहेब यांनी पत्र देऊन शेतकरी संघटनेला कळविले आहे या जुन महिन्यात याचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकरी यांना होईल असे म्हटले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!