Uncategorized

सिमेवर असलेल्या सैनिकांमुळे देश आज सुरक्षित – माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील

दुर्गापूरचा भुमीपूञ धनंजय मनकरची लेफ्टनंट कर्नलपदी निवड

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – सीमेवर असलेल्या सैनिकांमुळे देश आज सुरक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्यामुळे संरक्षण व्यवस्था सक्षम झाली आहे. प्रवरेच्या भूमीतूनही अनेक तरुण हे देशाच्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत दुर्गापूरच्या मेजर धनंजय मनकर चे लष्करात लेफ्टनंट कर्नलपदी झालेली पदोन्नती ही प्रवरेचा खऱ्या अर्थाने अभिमान असून त्याचा आदर्श घेत तरुणांनी सैनिक भरतीमध्ये करिअर करावे असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले. 

 

 दुर्गापूरचा भूमिपुत्र मेजर धनंजय दत्तात्रय मनकर यांची लष्करात लेफ्टनंट पदी पदोन्नती झाल्याबद्दल आयोजित गौरव सोहळ्यात माजी मंत्री म्हस्के पाटील बोलत होते. यावेळी वडील दत्तात्रय शहाजी मनकर, आई जिजाबाई, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास नाना तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अॅड अप्पासाहेब दिघे, माजी प्राचार्य डाॅ.गहीणीनाथ विखे, अण्णासाहेब कडू, सुनील तांबे, गिताराम तांबे, गोरक्षनाथ तांबे, छगनराव पुलाटे, सुनिल जाधव,सरपंच नानासाहेब पुलाटे माजी सुभेदार गोरक्ष ढमक,धोंडीबा पुलाटे, जिल्हाचे जेष्ठ साहित्यिक कवी यशवंत पुलाटे आदींसह परिसरातील आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की सहकारातून उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थेमुळे आज शिक्षण क्षेत्रामध्ये हा परिसर आघाडीवर आहे. शिक्षणाबरोबरच या भागातील अनेक तरुण देश सेवेतही दाखल झाले आहे अतिशय खडतर असा प्रवास करत मनकर कुटुंबियांनी करत हा परिवार घडवला. आज मेजर धनंजयची ही निवड अभिमानाची बाब आहे. स्वर्गीय शहाजी मनकर यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाले आहे. मनकर परिवाराने केलेले परिवर्तन हे नक्कीच इतरांसाठी आदर्श असेच ठरणार आहे. यावेळी मच्छिंद्र थेटे यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्याचा मुलगा हा लष्करात उच्च पातळीवर जात आहे याचा सर्वांनाच मोठा अभिमान आहे अतिशय कष्टातून उभा राहिलेले हे कुटुंब अनेकांसाठी आदर्श आहे आणि हा आदर्श प्रत्येकाने जपावा असे त्यांनी सांगितले. यावेळी गोरक्ष ढमक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आभार डॉ. सोमेश्वर मनकर यांनी मानले. 

 

 

सामाजिक बांधिलकी जपत मनकर कुटुंबीयांच्या वतीने गावात कार्यरत असलेल्या श्री.स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि बाल संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित केंद्रासाठी ५० हजाराची देणगी यावेळी मनकर परिवाराच्या वतीने देण्यात आली. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!