
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी –निळवंडे कालव्याचे पाणी प्रत्येकाला मिळावे यासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे लाभ क्षेत्रातील प्रत्येक गाव तळे पाण्याने भरतील यांची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी कोणीही राजकारण करू नये. पाण्याचा वापर जपून करा असे प्रतिपादन विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
निळवंडे लाभक्षेत्रातील लोणी खुर्द येथील बिरोबा लवण येथील तळ्याच्या जलपूजन कार्यक्रमात डॉ. सुजय हे पाटील यांनी केले. यावेळी भारत घोगरे, सचिन आहेर, बंटी आहेर, रोहित जगधने, राहुल जगधने, बाबासाहेब राऊत, शशिकांत आहेर, जालिंदर मापारी, शरद आहेर ,काळू राऊत , आदींसह या भागातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद साधतांना डॉ. विखे पाटील म्हणाले उन्हाळ्यामध्ये एकाच वेळी प्रवरा कालवा आणि निळवंडे कालवा प्रथमत वाहता झाला. उन्हाळ्यामध्ये आज भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रातील लाभार्थ्यांना या पाण्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला. आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येकाला पाणी मिळणार आहे शेवटच्या घटकाला पाणी मिळेपर्यंत हे आवर्तन सुरू राहील. आवर्तन काळात पाण्याचा अपव्य होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन मिळाल्याने शेतकऱ्यांचा आनंद आपल्यासाठी मोठा असल्याचेही त्यांनी सांगितले.
