Uncategorized

राष्ट्रीय श्रीराम संघ आयोजित श्रीरामनवमी खेळणा पाळना उत्सवाने थत्ते मैदानास आला भारदस्त पणा!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर- पन्नास वर्षात आले नाहीत असे खेळण्या पाळण्यांनी थत्ते मैदान यंदा भरून गेल्याने श्रीरामनवमी उत्सवाला भारदस्त पणा आला आहे.त्यामुळे श्रीराम रामनवमी यात्रेला जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.थत्ते मैदानावरील राष्ट्रीय श्रीराम संघ आयोजित पाळणा खेळणा उत्सवाला बदनाम करण्याचे षडयंत्र काही चिल्लर बाज पुढारी करत आहेत बरोबरी करण्याची लायकी नसणाऱ्यांना चांगलं कार्य करणाऱ्यांची बदनामी करूनच समाधान मिळत असल्याची संतप्त भावना अनेकांनी बोलून व्यक्त केली आहे.

 

परराज्यात देखील प्रसिद्ध असलेला श्रीरामपूरचा श्रीरामनवमी यात्रोत्सव गेल्या मागील काही वर्षात यात्रेच्या गर्दीत लवजिहाद सारखे प्रकार महिलांची छेडछाड भुरट्या चोऱ्या बाहेर गावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांना लुटण्याचे वाढत्या प्रकरणामुळे बदनाम झाला होता.पहाटे चार वाजेपर्यंत गर्दीचा उच्चांक असलेली यात्रा पोलिस प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणाने रात्री दहा नंतर बंद ठेवावी लागत आहे.

 

शहरातील सर्वधर्मसमभाव मानणारे काही सेक्युलर पुढाऱ्यांनी यात्रा काळात थत्ते मैदान लिलावात जिहाद्यांच्या ताब्यात देण्याच्या प्रवृत्तीमुळे हिंदू मुलींचे महिलांचे छेडछाडीचे प्रकार वाढले होते आणि या गर्दीचा फायदा घेत जिहादी मानसिकता असणारे भुरटे युवक हिंदू मुलींना लव जिहाद मध्ये अडकवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रमाण वाढले होते.अगदी शांत डोक्याने हिंदूंचे चालू असलेले खच्चीकरण या सेक्युलर पुढाऱ्यांना कधीही दिसले नाही पण जिहादी मतांसाठी आंधळे झालेले सेक्युलर पुढाऱ्यांचा जास्तीत जास्त कल हा जिहाद्यांना थत्ते मैदानावरील खेळणा पाळण्याचे टेंडर देण्यावर असल्याने त्यातून याअगोदर शहरात प्राणघातक हाणामाऱ्या देखील झालेल्या आहेत.हे वाढत चाललेले प्रकार थांबवावेत म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी यंदा जिहादी मुक्त यात्रोत्सव करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून थत्ते मैदानावर मोठ्याप्रमाणात राजकोट येथून खेळणा पाळणे आणून एक नवीन पायंडा सुरू केला आहे.

 

इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सवात किरकोळ वाद हे काही विघ्नसंतोषी घालत असतात म्हणून संपूर्ण यात्रोत्सवाला खोट्या अफवा पसरवून बदनाम करणारी टोळी श्रीरामपूर शहरात सध्या कार्यरत आहे.ज्यांची बरोबरी करण्याची लायकी नसते ते बदनामी करतात अशी संतप्त भावना काही यात्रकरूंनी व्यक्त करत राष्ट्रीय श्रीराम संघाच्या या नियोजनाला पाठिंबा दर्शवला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!