
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-दिघी रोड परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाकडी-धनगरवाडी परिसरातील बाळासाहेब त्रिंबक शेळके यांच्या शेतात एक बिबट्या जेरबंद झाला आहे.वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी वनरक्षक पी.डी.गजेवार घटनास्थळी दाखल झाले बिबट्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही केली असून. वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये एकाच ठिकाणी लागोपाठ दुसरा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर घडलेला घटनाक्रम असा की,धनगरवाडी परिसरातील बाळासाहेब त्रिंबक शेळके यांच्या शेतामध्ये गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ३ बिबटे मुक्त संचार करताना स्थानिकांना आढळून आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकरी राहुल शेळके व बाळासाहेब शेळके यांनी दिली.मंगळवारी याच ठिकाणाहून दोन दिवसापूर्वी एका बिबट्यास जेरबंद करण्यात आले होते. त्यामुळे पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती काल ८ रात्री वाजता तीन बिबटे पिंजऱ्या नजीक आले.दोन पैकी एका पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या भक्ष खाण्यासाठी गेला व जेरबंद झाला.सोबतचे दोन बिबट मात्र;पिंजऱ्याच्या सभोवताली चिंचेच्या झाडाजवळ मध्यरात्रीपर्यंत तळ ठोकून बसून राहिले होते.शेजारीच द्राक्ष,डाळिंब बाग उस,मका,गिन्नी,गवत अश्या पिकांचे क्षेत्र भरपूर आहे.यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी या ठिकाणचे वातावरण अनुकूल आहे शिकार व मुबलक भक्ष मिळत असल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीत धुमाकूळ सुरूच आहे.वाकडी-दिघी रोड जवळील खाणीच्या नजीक लागोपाठ दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.परिसरामध्ये अजून जास्त प्रमाणात बिबटे असल्याचे नागरिक सांगतात या घटनेनंतर शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार आणखी दोन पिंजरे बसविण्यात आले आहे.हे सर्व घडल्यानंतर रात्रीच शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला परंतु; रात्रीची वेळ असल्याने वनविभागाचे कर्मचारी वेळेवर दाखल झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनाच बिबट्याच्या पिंजऱ्याची राखणदारी करण्याची वेळ आली आहे.
चितळी-वाकडी-धनगरवाडी दिघी रोड परिसरामध्ये बिबट्यांचा अनेक महिन्यांपासून मुक्त संचार सुरूच आहे. त्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत दोन चिमुकले दगावले आहेत.परिसरामध्ये बिबटे भर दिवसा लहान मुलं नागरिकांसह जनावरांवर हल्ले करत आहेत.या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.वाकडी-धनगरवाडी शिवारामध्ये इतके बिबटे आले तरी कुठून असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. परिसरातील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बाळासाहेब शेळके, राहुल शेळके,विजय शेळके,सोमनाथ शेळके,धनंजय शेळके,कैलास शेळके,यश शेळके,ऋषिकेश शेळके,गणेश शेळके,सुनील शेळके,चांगदेब शेळके,ज्ञानदेव शेळके,किरण येलम,किशोर येलम,प्रमोद येलम,भारत येलम,वाल्मिक शेळके,राजू गोरे आदी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
