
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
चितळी-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी देण्यात यावी सरपंच हा गावच्या पाठीचा कणा असतो या निर्दयी घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे गावचा सरपंचच जर सुरक्षित नाही तर गाव कसे सुरक्षित राहील सरपंच संतोष देशमुख यांच्या सोबत घडलेल्या घटनेचा शासनाने तपास करावा पोलीस प्रशासनाने आगामी काळात मस्साजोग येथे घडलेल्या घटनेचा बोध घ्यावा ही घटना अतिशय घातक असून यात एका लोकसेवकाचा जीव गेला आहे दिवसा-ढवळ्या एका सरपंचाचे अपहरण करण्यात येते व हत्या केली जाते ही बाब अतिशय विदारक असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी मस्साजोग येथे घडलेली घटना निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया चितळी गावचे सरपंच नारायण कदम यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे कथित स्वरूपात अपहरण करण्यात आले त्यानंतर अतिशय निर्घुण पणे हत्या करण्यात आली याघटनेचे पडसाद राहाता तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत उमटलेले असून हत्येच्या घटनेमूळे सर्वत्र महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यापार्श्वभुमीवर नववर्षाच्या सुरुवातीलाच बुधवार (ता.१ रोजी) चितळी (ता.राहाता) येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले व मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केल्याप्रकरणी चितळी येथील समस्त ग्रामपंचायत पदाधिकार्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी मधुकर आग्रे, उपसरपंच कविता पगारे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाणी,दत्तात्रय सुसरे,प्रकाश आरणे,संजय वाघ,अजय कुऱ्हाडे,मच्छिंद्र वाघ,जयश्री वाघ,विद्या शिंदे,सुवर्णा माळी,ताराबाई गायकवाड,स्वाती वाघ, सुनीता वाघ,आदींनी ग्रामपंचायत काम बंद आंदोलनाला पाठींबा देवून घटनेचा तिव्र निषेध व्यक्त केला आहे.
मस्साजोग घटनेत गतप्राण झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवारास महाराष्ट्र राज्य शासनाने ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी सरपंच देशमुख यांच्या खुनाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घ्यावे मस्साजोग येथे घडलेली घटना निंदनीय आहे आगामी काळात राज्यातील सर्व सरपंचांना शासनाने संरक्षण द्यावे..
– लोकंनियुक्त सरपंच नारायणराव कदम
