
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – जीवनात मानवता धर्म व माणुसकी खूप महत्त्वाची आहे संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक दिवंगत शंकरराव कोल्हे यांनी मानवता धर्म आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श आमच्या सर्वांसमोर ठेवला असून याच बळावर कोल्हे परिवाराने जनतेच्या प्रेमासह अतूट विश्वास कमवला आहे.असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा शंकरराव कोल्हे यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्त एसजेएस हॉस्पिटल व विवेकभैय्या कोल्हे मित्र मंडळ चितळी,यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शनिवार (दि.२१) आयोजन करण्यात आले होते.यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला माजी आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शिबिराचे फीत कापून मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष निवड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आरणे यांनी केली अध्यक्षस्थानी जेष्ठ गंगाधर चौधरी, होते अनुमोदन सुभाष तनपुरे यांनी दिले.विक्रम वाघ यांनी प्रास्ताविक केले.यावेळी कार्यक्रमाच्या सर्व प्रथम माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून प्रतिमा पूजन करण्यात आले.शिबिरात 308 नागरिकांची विनामूल्य तपासनी करण्यात आली.यासोबत 40 नागरिकांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रवाना करण्यात आले.
यावेळी त्यापुढे बोलताना म्हणाल्या की, दिवंगत माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांचा अमूल्य वारसा कोल्हे परिवाराने जपला आहे यामुळे सर्व कार्यकर्ते देखील मोठ्या ताकतीने गोरगरिबांची मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोरोना काळात मोठे कोरोना सेंटर उभारून सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठे बळ दिले त्यावेळी ऑक्सिजनची व्यवस्था तातडीने करून दिली त्यामुळे निश्चितच विवेक कोल्हे यांना गणेशच्या निवडणुकीत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळाला आहे.
श्री.गणेश कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली एक युवक म्हणून ते प्रयत्न करत नव्हते तर त्यांच्याबरोबर स्व.शंकरराव कोल्हे साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ताकतीने काम करणारे वयोवृद्ध जेष्ठ कार्यकर्ते देखील प्रयत्न करत होते.सर्वसामान्य जनतेने दाखवलेला हा विश्वास खूप मोठा असून तो कोल्हे परिवाराला कमावता आला राजकारणात चढ-उतार होईल परंतु तुमचं प्रेम असंच असू द्या कारण कोल्हे परिवाराचे व चितळी गावाचे एक अतूट प्रेमाचं नाते निर्माण झाले आहे.सामाजिक बांधिलकी जी आपण जपतो तीच आपली संस्कृती आहे आणि संस्कार आहे. असे त्या बोलताना म्हणाल्या.
यावेळी चितळी ग्रामस्थांच्या वतीने बिपीन कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येवून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्व.बाळासाहेब गेणूजी वाघ यांच्या स्मरणार्थ दिव्यांगांना भेटवस्तूसह व बारावीच्या विद्यार्थ्यांना तब्बल ६५ डजन वह्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.विक्रम वाघ यांचे वडील दिवंगत बाळासाहेब गेनूजी वाघ यांच्या स्मरणार्थ ५०० वृक्ष वाटप केले.सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते गंगाधर चौधरी,गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे,उपध्यक्ष विजय दंडवते,गणेशचे संचालक संपतराव चौधरी,अनिल गाढवे, आलेश कापसे,सरपंच नारायणराव कदम,विक्रम वाघ, गावकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी संचालक भाऊसाहेब चौधरी,माजी चेअरमन शिवाजीराव लहारे,आलेश कापसे,वाकडीच्या सरपंच रोहिणी आहेर,वाकडीचे माजी सरपंच अनिलराव शेळके,मधुकर सातव,माजी संचालक संजयराव शेळके,अरविंद फोपसे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश आरणे,बी.एल आहेर,ग्रामपंचायत सदस्य ताराबाई गायकवाड,संपतरावं वाघ,सुभाष वाघ, सुभाष तनपुरे, रमेश तनपुरे, विजय पटारे, अजय गायकवाड,अजय कुऱ्हाडे,भैय्यासाहेब वाघ, दिंगंबर वाघ,ऍड.संध्याताई थोरात,महेंद्र चौधरी,सरपंच संदीप सुरडकर, स्वीय सहायक सुभाष जामदार,जालिंदर पवार एसजे.एस हॉस्पिटलच्या डॉ. सायली ठोंबरे,डॉ. प्रशांत डुंबरे,डॉ.गणेश आनंद घोडेगावकर,डॉ. नितीन तोरणे,डॉ. अनिरुद्ध उबाळे,डॉ. साहिल माळी,डॉ. मेहेरबान सिंग,डॉ. सोनाली काळे साईप्रसाद पाचोरे,महेश रक्ताटे,आदींसह संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
