आरोग्यकोपरगाव तालुका

कोपरगावात कागदी चहाच्या कपांवर बंदी आणावी डॉ.अशोक गावित्रेंची मागणी

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी -अक्षय काळे

 

कोपरगाव शहर – चहासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कप बनवताना त्यात बी पी ए नावाच केमिकल वापरले जाते तसेच कपामध्ये हायड्रोफोबिन फिल्मचा थर आतून दिला जातो व गरम चहासोबत तो त्यात विरघळून पोटात गेल्यास कॅन्सरचा धोका उद्भवतो ,एका चहाच्या कपासोबत पंचवीस हजार मायक्रोम प्लास्टिक पोटात जाते हे सामान्य जनतेला जीवितास हानिकारक आहे तरी यावर बंदी घालावी अशी मागणी डॉ.अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली.

 

कोपरगाव शहरातील नगर पालिका व ग्रामपंचायत हद्दीतील चहा टपरीधारकांची एक बैठक आयोजित करावी व त्यात हा निर्णय घ्यावा ,तसेच नियमांच उल्लंघन केल्यास दंड म्हणून पहिल्या वेळेस ५००,दुसऱ्यादा१००,तिसऱ्यादा १५०० त्यानंतर केल्यास त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करावा ,तसेच यासंदर्भात ठिकठिकाणी फलक लावावेत व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कागदी कपा वर त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

पर्यावरण विभागाचे यावर अगोदरच बंदी घातली असुन अनेक जिल्हात यावर बंदी घालण्यात येत असून कोपरगाव तालुक्यात यावर अमलबजावणी व्हावी अशी मागणीही डाॕ.अशोक गाविञे यांनी केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!