
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना एका महिला शेतकऱीने प्रेमाने हाक मारली दादा “या ना शेतात… थोड्या शेंगा खा!” त्यांच्या या साध्या निमंत्रणाने भारावून गेलेले डॉ. सुजय विखे पाटील थांबले, अंन..शेतात गेले आणि त्या महिलेबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या.याचबरोबर जमिनीवरच बसून भुईमुगाच्या शेंगा चाखल्या आणि मातीचा गंध घेत माणुसकीचा स्पर्श अनुभवला.
या भेटीत केवळ शेंगाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणी, पाणीटंचाई, पीक समस्या यावरही चर्चा झाली. “शेतकरी म्हणजे देशाची खरी संपत्ती, त्यांचं दुःख समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे,” असे उद्गार त्यांनी मनापासून व्यक्त केले. त्यांच्या अशा साध्या पण आत्मीय संवादातून जनतेशी असलेली त्यांची नाळ स्पष्ट दिसून आली.
ही भेट म्हणजे केवळ एक दौरा नव्हता, तर मातीशी, माणसांशी आणि नात्यांशी असलेली जिव्हाळ्याची जपणूक होती. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की लोकप्रतिनिधी हे जनतेच्या भावविश्वाशी जोडले गेले तर राजकारणापलीकडची माणुसकी अधिक महत्त्वाची ठरते.
