महाराष्ट्रसामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या नावाने पुरस्कार वितरण आणि तालुक्यातील विकास प्रकल्पांचे भूमिपूजन; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

पारनेर – जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध विकास कामाचा शुभारंभ तसेच अण्णा हजारे यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति आणि संस्थाना देण्यात येणार्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 

यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत राळेगण येथे वरीष्ठ अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, ठिकाण आणि अन्य नियोजना बाबत विभगाच्या अधिकार्यां कडून सविस्तर माहीती घेतली.या बैठकीला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आ.काशिनाथ दाते जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे भाजपाचे अध्यक्ष राहूल शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राळेगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,सौर उर्जा प्रकल्प कृष्णा पाणी पुरवठा योजना,जलजीवन योजना,जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाच्या निमिताने स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेकडून देण्यात येणार्या श्री.अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्काराने सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.

मंत्री विखे पाटील यांनी नियोजन बैठकीत सर्व विभागांनी पूर्ण केलेल्या कामांचा आढावा घेवून सर्व काम एक आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.शाळा खोल्यांचे उद्घाटन करताना सर्व वर्ग डिजिटल क्लासरुम करण्याच्या सूचनाही दिल्या.सभेच्या ठिकाणाची पाहाणी करून मंत्री विखे पाटील यांनी पावसाची शक्यता लक्षात घेवून त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्याची सूचना पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रशसनाला दिल्या.

 

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून,यंदाच्या वर्षी माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ राजेंद्र धामणे व सौ.सुचेता धामणे,बीड जिल्ह्यातील गेवराई येथील आई संस्थेचे संतोष गर्जे, कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचे अध्यक्ष श्री.किशोर देशपांडे शेवगाव तालुक्यातील उचल फौंडेशनचे अध्यक्ष सचिन खेडेकर यांना यंदाच्या वर्षी पुरस्कार जाहीर यापुर्वीच जाहीर झाले आहेत.

 

बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पद्मविभूषण अण्णा हजारे हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत.त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी निमंत्रित करण्यात आले आहे.अण्णांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा सत्कार सोहळा आणि विविध विकास कामाचा शुभारंभ जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण असेल.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!