
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी- गोपाल शिंदे
श्रीरामपूर – तहसीलमधील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासन नियमबाह्य काम करणारे आपले सरकार सेवा केंद्र(सेतू) कार्यालयांची संख्या शहरात वाढली असून अशा नियमबाह्य काम करणाऱ्या सेतू चालकांनी भरमसाठ पैसे खाऊन जिहाद्यांना दाखले मिळवून दिलेले आहेत तर घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाने मंजूर केलेली पाच ब्रास मोफत वाळू देखील तहसील अधिकाऱ्यांना व सेतू चालकांना हाताशी धरून काहीं पुढाऱ्यांच्या चमच्यांनी खाल्लेली आहे.कोणतेही कागदपत्रांची खातरजमा न करता मिळवलेल्या दाखल्यांवर पात्रता नसणाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या,सवलती आणि इतर शासकीय लाभ लाटलेले आहेत त्याची सखोल चौकशी होऊन दोषी तहसील कर्मचारी व सेतू चालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी केली आहे.
राष्ट्रीय श्रीराम संघाच्या जागरूक कार्यकर्त्यांनी हा गंभीर देशाला घातक ठरणारा प्रकार उघडकीस आणून सागर भैय्या बेग यांना सविस्तरपणे सांगितला.त्यावरून सागर भैय्या बेग यांनी ताबडतोब स्वतः तहसील कार्यालयात याबाबत लेखी तक्रार दिली त्यानुसार तहसीलदार यांचेसमोर सुनावणी सध्या चालू आहे.
राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त यांनी नुकतीच श्रीरामपूर तहसील व प्रांत कार्यालयांना भेट देऊन शहरातील सेतू कार्यालयांची पाहणी केली तेंव्हा सागर बेग यांनी केलेल्या तक्रारीत दोषी आढळून आलेले बहुतेक सेतू चालक कार्यालये बंद ठेवून जाणूनबुजून त्यादिवशी फरार झालेले निदर्शनास आलेले आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यात चौदा पाकिस्तानी नागरिक घुसून बसल्याची माहिती ऑपरेशन सिन्दुर कारवाईनंतर उघडकीस आली आहे.तर त्या चौदापैकी तीनजण हे श्रीरामपूर शहरात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.ही बाब देशाच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने घातक आहे.भारतात घुसखोरीचे प्रमाण वाढले असून बांगला देश,म्यानमार आणि पाकिस्तानातून भारतात घुसखोरीचे प्रमाण जास्त आहे.अशा घुसखोरी केलेल्या घुसखोरांना भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोठे रॅकेट देशात कार्यान्वित आहे.आणि अशा रॅकेटशी हातमिळवणी करून शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी व अशा सरकारी कार्यालयाबाहेरील सेतू चालक हे मोठ्या पैशाच्या अमिषापोटी कोणत्याही कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता दाखले मंजूर करत आहेत.ही बाब अत्यंत गंभीर असून श्रीरामपूर शहरात घुसून बसलेल्या त्या तीन पाकिस्तानी नागरिकांना बनावट दाखले तर देण्यात आलेले नाहीत ना असा संशय देखील सागर भैय्या बेग यांनी व्यक्त केलेला आहे.
सेतू चालकांची व तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची मिलीभगत उघड झाली असून ज्याप्रमाणे चोराला रंगेहाथ पकडल्यावर सराईत भामटा चोर सुरवातीला उडवाउडवीचे उत्तरे देऊन निर्दोषपणाचा आव आणतो त्याचप्रमाणे कर्मचारी तक्रारदाराला खोट्या माहित्या देऊन धुडकावण्याचाही प्रयत्न करतात.पण तक्रारदार खमक्या आणि देशप्रेमी धर्मप्रेमी एकवचनी स्वतः धर्मरक्षक सागर बेग हेच असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना नांग्या टाकण्याशिवाय पर्यायच नाही.श्रीरामपूर तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून असे प्रकार घडत आहेत आणि अजूनही असे प्रकार तक्रारी नंतर देखील चालू आहे हे विशेष.परंतु जागरूक धर्मप्रेमी देशप्रेमी राष्ट्रीय श्रीराम संघामुळे हा प्रकार उघड झाला असून दोषीं कर्मचारी व सेतू चालकांवर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या अधिकारात काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचें लक्ष लागलेले आहे.
सेतू मधून पुढील कारवाईस्तव तहसील कार्यालयात ज्या टेबलवर ही प्रकरणे जातात तो कर्मचारी सेतू चालकाशी हातमिळवणी करून दाखल झालेल्या कागदपत्रांची कोणतीही खातरजमा न करता ते प्रकरण त्याच्या कार्यभागात ताबडतोब मंजूर करतो व पुढे ते प्रकरण अंतिम सहीसाठी तहसीलदार यांच्याकडे पाठवतो तहसीलदार खालील कर्मचाऱ्यांवर भरवसा ठेवून प्रकरण मंजूर करून सही करतात.माहिनो महिने चकरा मारूनही सर्वसामान्य नागरिकांचे काम न करणारे तहसीलमधील कर्मचारी सेतू मधून आलेले अशी प्रकरणे काही मिनिटात मंजूर करून दाखले देतात हा सगळा प्रकार यांची मिलीभगत उघडी पडणारा असा आहे असेही सागर भैय्या बेग यांनी म्हंटले आहे.या प्रकरणात सेतू चालक आणि तहसील कार्यालयातील सेतूमधून येणारे प्रकरणे मंजूर करून दाखले देण्याचे काम करणारा तहसीलमधील कर्मचारी गुन्हेगार असून सेतू चालक व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सागर बेग यांनी केली आहे.
श्रीरामपूर तहसील मधून EWS ,भूमिहीन व इतरही शासकीय योजना लाटण्याचे असे अनेक दाखले सेतू चालक व तहसीलमधील कर्मचाऱ्यांच्या पैशांच्या आमिषामुळे जिहाद्यांना देण्यात आले असून ही बाब अत्यंत गंभीर आणि देशाला घातक अशी असून सेतू चालक ते तहसील कर्मचारी ही साखळी संपूर्ण राज्यभर नक्कीच असणार असून श्रीरामपूरात उघडकीस आलेल्या या प्रकरणावरून राज्यातील संपूर्ण सेतू कार्यालयातील गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी देण्यात आलेल्या दाखल्यांची फेर तपासणी करण्याची मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे सागर भैय्या बेग यांनी सांगितले आहे.
