
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चितळी (ता.राहाता) महाविद्यालयाने इयत्ता दहावी (मार्च २०२५) च्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून यावर्षी चितळी महाविद्यालयात एकूण ८९.५१ टक्के निकालाची नोंद करण्यात आली असून यावर्षी विद्यार्थिनींनी इयत्ता दहावीच्या निकालात आपले वर्चस्व कायम राखले आहे.
महाविद्यालयामधील कु.देविका अशांत वाणी हिने ९४.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु.श्रेया राजेंद्र वाघ हिने ९२.०० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर कु.प्रियांका सचिन शेळके हिने ८८.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.यावेळी तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.या यशाबद्दल मुख्याध्यापक शिरसाट एन. एन.पर्यवेक्षिका श्रीमती सातव ए.तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या निकालाचे श्रेय विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत,शिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच पालकांचे सहकार्य यांना जाते, असे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शिरसाट एन.एन. यांनी सांगितले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे,विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, प्रमोद तोरणे, उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य भाऊसाहेब मोरे, ॲड.अशोकराव वाघ,जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेशचे संचालक संपतराव चौधरी,भाऊसाहेब चौधरी,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शंकरराव चौधरी,दिलीपराव चौधरी, दिपकराव वाघ,चितळीचे सरपंच नारायणराव कदम,नितीन चौधरी,शंकर नाना चौधरी,राजेंद्र चौधरी,दीपक वाघ,विक्रम वाघ, महेंद्र चौधरी,चंद्रकांत वाघ,पालक संघ उपाध्यक्ष पत्रकार अशोक वाणी,सचिव आबासाहेब जोशी एल.आर गायकवाड,मुख्याध्यापक नामदेव शिरसाट, पर्यवेक्षिका सातव मॅडम,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी स्थानिक शाळा समिती,शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, चितळी-जळगाव ग्रामस्थ व संपूर्ण शिक्षणवर्ग यांनी शाळेच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
