
आश्वी प्रतिनिधी-वैभव ताजणे
मतदार संघातील बहुचर्चीत आश्वी बु ता संगमनेर येथील ग्रामपंचायत मध्ये बबनराव शिदें यांनी एकमताने निवड करण्यात आली.गेल्या १० वर्षापासुन आश्वी बु तालुका संगमनेर येथील ग्रामपंचायत ही माजी आमदार बाळासाहेब थोरात गटा कडे सत्ता असुन मागील पंचवार्षीक मध्ये विखे गटाचा १ सदस्य होता तर यावेळी ६ ग्रामपंचयत सदस्य निवडुन आले होते. तर या पंचवार्षीक मध्ये थोरात गटाकडे ९ सदस्य निवडुन आले होते.
अहिल्यानगर च्या लोकसभा निवडणुकी पुर्वीच आश्वी बु येथील ग्रामपंचायत चे निवडणुक संपन्न झाली होती. यामध्ये माजी आमदार बाळासाहेब थोरत गटाच्या ९ जागा तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या ६ जागा निवडुन आल्या.विधानसभा निवडणुकीत संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा प्रचंड पराभव झाल्या नंतर कार्यकत्यांना आलेली मरगळ कमी करण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील अनेक भागचा दौरा सुरू केला तसेच संघटनेत अनेक ठिकाणी खांदे बदल सुरू केले.
आश्वी बु येथील ग्रामपंचयातच्या उपसरपंच अरूणा हिंगे यांनी एक आठवड्या पुर्वीच आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्या अनुशंगाने निवडणुक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी राकेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तर सरपंच नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली दि ११ रोजी उपसरपंच निवडणुक संपन्न झाली. यामध्ये थोरात गटाकडुन ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे यांनी अर्ज दाखल केला तर विखे गटा कडुन ग्रामपंचायत सदस्य अनिल कंगणकर तसेच सारीका जऱ्हाड यांनी अर्ज दाखल केला होता. छानणी अंतर्गत माजी आमदार बाळासाहेब थोरात गटाकडुन बबनराव शिदें व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाकडून अनिल कंगणकर यांच्या मध्ये उपसरपंच पदासाठी निवडणुक संपन्न झाली.यामध्ये थोरात गटाच्या संख्या बळामुळे बबनराव शिंदे यांचा विजय झाला तर अनिल कंगणकर यांचा पराभव झाला. निवडणुकी मध्ये बबनराव शिदें यांना १० मते पडली तर अनिल कंगणकर यांना ६ मते पडली. यामुळे ज्येष्ठ सदस्य बबनराव शिदें यांची आश्वी बु येथील उपसरपंच पदी नियुक्ती करण्यात आली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाकडुन अनिल कंगणकर,भाऊसाहेब खेमनर, सारीका जऱ्हाड,मिना गायकवाड,बिजलाबाई मोरे, पुजा राखपसरे तर माजी आमदार बाळासाहेब गटाकडुन सरपंच नामदेव शिंदे, अरूणा हिंगे, उपसरपंच बबनराव शिंदे,बाळासाहेब मदने,अविनाश गायकवाड, दर्शना ताजणे, परीघा गायकवाड,जयश्री केदारी,अझरूद्दीन शेख,अभिजीत ताजणे तर यांनी मतदानांचा हक्क बजावला.
संगमनेर तालुक्यातील राजकीय परिस्थिती बघता आश्वी बु येतील ग्रामपंचायत सदस्य विखे गटात प्रवेश करतील अशी खाजगीत चर्चा होती यामुळे दोन दिवसापासुन येथील ३ ते ४ ग्रामपंचायत सदस्यांना गोवा येथे घेऊन जाण्यात आले होते. निवडणुकी पूर्वी घोडे बाजार होऊन सदस्याची पळवा पळव होऊ नये यासाठी या सदस्यांना गोवा येथे घेऊन जाण्यात आल्याची चर्चा परीसरा मध्ये होती.
