महाराष्ट्र

राहाता तालुक्यातील वाकडी येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी खंडोबाची येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्व पक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी (दि.२८) हनुमान मंदीरात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कश्मीर येथील पहलगाम याठिकाणी दहशदवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या २८ भारतीय नागरिकांना सामुदायिक श्रंद्धाजली अर्पण करण्यात आली.या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी समस्त ग्रामस्थांनी केली आहे.

 

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके बाळासाहेब आहेर,गोरक्षनाथ कोते,भाऊसाहेब शेळके, राजेंद्र लहारे,शिवाजीराव लहारे यांनी भावना व्यक्त करून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.याप्रसंगी अनील शेळके बापूसाहेब लहारे,मुरलीधर शेळके,सुरेश जाधव,कोंडीराम शेळके,सुनील लहारे,अभय शेळके, सुरेश आबा लहारे,अमोल कापसे,बाळासाहेब शेळके, वसंतराव एलम,भाऊसाहेब आहेर गंगाधर नाना कोते,आदीसह गावातील ग्रामस्थ व व्यापारीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!