महाराष्ट्र

वक्फ बोर्डाच्या सुधारित कायद्याला संसदेत विरोध करणाऱ्या ‘खासदारांना’ गावबंदी करावी – सागर बेग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- गोपाल शिंदे

 

श्रीरामपूर – देश पोखरणाऱ्या वक्फ बोर्डाच्या विरोधात संसदेत दाखल केलेल्या ठरावाविरुद्ध मतदान करणाऱ्या खासदारांना देशभर गावबंदी चालू झाली आहे.शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील गावबंदी करून त्यांना त्यांची जागा दाखवावी असे स्पष्ट आणि प्रखर आवाहन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केले आहे.

 

राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी सागर बेग हे बोलत होते.कार्यक्रमास दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील,प्रदीप मगर,नाना गायकर,योगेश महाराज कांदळकर, रोहिणीताई राऊत,प्रवरा कारखाना संचालक रामप्रसाद मगर,संतोष चव्हाण,पंकज जाधव,नामदेव पांढरकर,बाळासाहेब धुळसुंदर हे उपस्थित होते.

 

वक्फ बोर्डाच्या सुधारित कायद्याला विरोध करणाऱ्या १९५ खासदारांमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील विरोधात मतदान केले आहे.त्यांची ही वृत्ती देशविघातक देशविरोधी असून अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची जागा दाखवावीच लागणार आहे.गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसच्या काळात अनेक हिंदू विरोधी,देश पोखरणारे कायदे कानून बनवण्यात आलेले आहेत.अशा कायद्यांमुळे देशाला त्यामुळे एकप्रकारे अधोगतीच लागली होती.या सगळ्या कायद्यांची हवा काढून घेण्याचे व तसे विरोधी कायदे कायमचे हद्दपार करण्याचे काम केंद्र शासनाने चालू केलेले आहे त्यास आपण पाठिंबा देणे गरजेचे असताना ज्यांना हिंदूंनी आपल्या भल्यासाठी निवडून दिले असे खासदार जर हिंदूंचा विश्वासघात करून हिंदू विरोधी कायद्यांच्या बाजूने उभे राहत असतील तर अशा खासदारांना देखील आपल्या गावात येण्यावर बंदी घालावी असे आवाहन सागर बेग यांनी केले आहे.

 

बेग पुढे म्हणाले की,राजकारण करतांना आपले वयक्तिक काहीही मत असो पण हिंदूच्या आस्थेचा जेव्हा प्रश्न समोर येईल तेव्हा मात्र सर्वांनी एकजुटीने धर्मामागे उभे राहिले पाहिजे.राजकारण आणि धर्म यांची घालमेल न करता पाक्षासाठी काहीही करा पण धर्मावर जेव्हा संकट येईल तेव्हा एक व्हा असे कळकळीचे आवाहन बेग यांनी करून ते शेवटी म्हणाले की,नुकत्याच होऊन गेलेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मधून जो प्रामाणिकपणे हिंदू धर्माचे रक्षण करेल अशा उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी आम्ही एकमुखाने केली होती.त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी देखील सकल हिंदू समाजाने घेतली होती पण राजकारणी लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा फायदा जिहादी धार्जिण्या काँग्रेसी पक्षाला झाला.मी अपक्ष उमेदवारी करूनही पन्नास हजाराच्या आसपास मतदान मला फक्त हिंदूंनीच केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!