
लोणी – पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन (आयबीएमए) “राष्ट्र प्रथम” ही विशेष मोहिम राष्ट्राभिमानाच्या आणि देशनिष्ठेच्या भावनेने उत्साहात पार पडली. देशाच्या सुरक्षेसाठी आणि शौर्याच्या प्रतीक असलेल्या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि पहलगाम येथील घटनेनंतर भारतीय लष्कराने उचललेल्या पावलांचे समर्थन करण्यासाठी, संस्थेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती फेरीतून देशभक्तीचा जागर केला.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे,राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचवणे आणि जबाबदार नागरिकत्वाचे भान निर्माण करणे हा होता.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रियाताई ढोकणे विखे पाटील, संस्थेचे सचिव आणि संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याचाच एक भाग पायरेन्स आयबीएमएमध्ये” ही विशेष मोहिम आयोजित करण्यात आली.
आयबीएमएचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांच्या मार्गदर्शनात म्हणाले, “राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर त्यांनी सखोल भाष्य करत विद्यार्थ्यांना देशहितासाठी सजग आणि सक्रिय राहण्याचे आवाहन केले. ही संकल्पना म्हणजे ‘राष्ट्र सर्वोच्च’ – प्रत्येक कृती राष्ट्रहितासाठीच असावी, हीच भावना रुजवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. कार्यक्रमात पर्यावरण रक्षण, मतदार जागृती, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत मिशन यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी पोस्टर, घोषवाक्य व प्रबोधन गीतांद्वारे नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली.माझ्या भारत देशावर निस्सीम प्रेम करतो/करते. माझं शिक्षण, माझं ज्ञान, आणि माझी कृती – राष्ट्रहितासाठी वापरीन. देशाच्या एकतेसाठी, शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने काम करीन. ‘राष्ट्र प्रथम’ हीच माझी प्रेरणा राहील अशीविद्यार्थ्यानी प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमात एमबीए, एमसीए, बी.व्होक या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल येथील कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा उपक्रम संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.
