
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
पुणतांबा – अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या पुणतांबा-वाकडी रस्ता दुरुस्तीकडे अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्ता जिल्ह्याच्या नकाशावर आहे की नाही ? असा प्रश्न रस्त्यावरील राहणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे तातडीने संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू न झाल्यास पुणतांबा कोपरगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पुणतांबा वाकडी हा आठ किलोमीटर अंतराचा रस्ता गणेशनगर, वाकडी, बाभळेश्वर, लोणी, कोल्हार येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. मात्र, रस्तावर वेड्या बाभळींनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झालेला आहे.
तसेच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली वाहन चालकांनी आपला मार्ग बदलला आहे. परंतु, या रस्त्यावर वस्ती करून सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणर्णीचा सामना करून रस्ता पार करावा लागतो असुन पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागत आहे गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून संपूर्ण रस्त्याची दुरूस्तीचनसल्याने हा रस्ता नकाशावर आहे की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जि. प. कडून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगावकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, अद्याप खड्डेही बुजविण्यात आलेले नसून आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या वर्षी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते काही महिन्यापूर्वी खडीचे दोन ढीग टाकण्यात आले होते मात्र पुढे काहीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.रस्ता दुरुस्ती साठी सर्वच लोकप्रतिनिर्धीकडून केवळ आश्वासने दिली जातात. गेल्या वर्षी आमरण उपोषण आले होते तसेच रस्ता दुरुस्तीसाठी या भागातील नागरिकांकडून कायमच निवेदने दिली जात आहे मात्र अद्यापही काम सुरू होतं नाही
पावसाळ्यापूर्वी तातडीने या संपूर्ण आठ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि खडी टाकलेल्या ठेकेदाराने तातडीने काम सुरू करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन काम सुरू न झाल्यास नागरिकांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे माजी उपसरपंच संदीप धनवटे यांनी सांगितले.
