
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – शहरातील मिल्लतनगर परिसरात जेष्ठ पत्रकार सलीमखान चाँंदखान पठाण यांनी शांतता बैठकीत जनतेच्या भावना पत्रकार या नात्याने मांडल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना शासना पर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकार सातत्याने करीत असतो.तीच भावना ठेवून शांतता कमिटीच्या बैठकीत भोंग्याच्या आवाजाचा प्रश्न मांडला असता याचा राग मनात धरुन पत्रकार पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.हल्लेखोर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकार व पत्रकार हल्ला कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
श्रीरामपूर येथिल जेष्ठ पत्रकार सलीमखान पठाण हे रात्री ८;१५ वा.नमाज पठण करण्यासाठी चालले असताना त्यांच्या राहत्या घराजवळ आरोपींनी अडवून शनिवारी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकला होता.त्यांचा राग मनात धरुन आरोपींवर पत्रकार पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.
पत्रकार पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जोएब युनुस जमादार, हुजेब युनुस जमादार, ओसामा युनुस जमादार, झिशान गनी शेख, राजीक शेख, झिशान सय्यद, लुकमान शहा, शाहीद मुख्तार शेख आणि इतर सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू पोलिसांनी तीन दिवस झाले तरी अद्याप एका हि हल्लेखोरांना ताब्यात घेतले नाही.हल्लेखोरांनी हल्ला करताना पत्रकार पठाण यांच्या खिशातील २७ हजार रुपये व गळ्यातील दिड तोळा वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली आहे.हल्लेखोरांवर रस्ता लुटुचा गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.पत्रकार पठाण यांच्यावर कामगार हाँस्पीटल येथे उपचार सुरु असून त्यांच्या सहा बरगड्या फँच्चर झाल्या आहेत.
श्रीरामपूर पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलिस स्टेशन वर मोर्चा नेण्यात येईल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे उत्तर नगर पत्रकार हल्ला कृती समितीचे निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे,जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे, मराठी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, सरचिटणीस रोहित टेके,श्रीरामपुर तालुकाध्यक्ष ज्ञानेश गवले,राहुरी तालुकाध्यक्ष रफिक शेख यांनी सांगितले.
श्रीरामपूर शहर पोलिसांनी पत्रकांराच्या निवेदनाची दखल घेवूनआरोपींना तात्काळ अटक करावी.यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे, पत्रकार हल्ला कृती समितीचे समन्वयक राजेंद्र उंडे, श्रीरामपुर प्रेस क्लबचे अध्यक्ष व परिषदेचे सल्लागार अशोक गाडेकर, प्रकाश कुलथे, नागेश सावंत,अनिल पांडे,दिपक उंडे,संतोष बनकर,सचिन उघडे,पद्माकर शिंपी,सुरेश कांगुणे, महेश माळवे,प्रदिप आहेर, मधुकर माळवे, रफिक शेख,नितीन चित्ते,नितीन शेळके आदी उपस्थित होते.
