धार्मिक

समाजामधील विषमता भगवंताने दूर केली – ह.भ.प रविंद्र महाराज मुठे

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 


श्रीरामपूर – सर्वच जाती-धर्मातील लोकांचं एकत्रीकरण केले तर,सर्वांना समान वाटप सुद्धा केलं,आदर्श राज्यपद्धती अन् जीव शिव ऐक्याची शिकवण आपल्या कृतीतून मांडली गेली. जो गुरुचा झाला त्याला भगवंत सहज प्राप्त होतो असा उपदेश श्री हरिहर केशव गोविंद देवस्थानचे विश्वस्त आणि भागवताचार्य ह.भ.प.रविंद्र महाराज मुठे यांनी बेगलोरयेथे काल्याच्या कीर्तनाप्रसंगी काढले.


विश्व अध्यात्मिक ग्रुप,आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे संस्थापक आचार्य सद्गुरु श्री रविशंकरजी महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरातील श्री श्री इंटरनॅशनल आश्रम याठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन,गाथा पूजन, वारकरी दिंडी व सत्संग आयोजन करण्यात आले.तसेच वरिष्ठ स्वामी प्रणवानंदजी महाराज व ब्रह्मचारी पुण्यश्लोकजी महाराज यांच्या अधिपत्याखाली सप्ताह उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक ज्येष्ठ मार्गदर्शिका रचना सदाफुले- फासाटे, संतोष गवारे शरद डोलारकर साहिल टिळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 


उरुळी कांचन येथील युवाकीर्तनकार तुषार महाराज चौधरी यांनीही आपली किर्तनसेवा या सप्ताहात रुजू केली.आळंदी येथून आलेले मृदुंगाचार्य विष्णू महाराज आरगडे,अमोल महाराज आवाड,गायनाचार्य सोमनाथ महाराज आरडे या सर्वांची सप्ताह साथ मिळाली.
हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा मंत्री व नाशिक विभाग मठ मंदिर विकास समितीचे प्रमुख ह.भ. प. दत्तात्रय महाराज बहिरट, आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे वरिष्ठ भक्त रसिक गौरदास प्रभू,श्री हरिहर केशव गोविंद देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष जालिंदर थोरात यांनी विशेष यांनी परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!