गुन्हेगारी

चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रात ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ !

अंदाजे ५ ते ६ वर्षीय मुलाची अज्ञात गुन्हेगाराकडून हत्या  केल्यानंतर त्याचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून चासनळी गोदावरी नदीत फेकल्याची घटना शुक्रवार ( ता.२०) डिसेंबर रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे.

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

अहिल्यानगर: (ता.२१) कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून गोदावरी नदी पात्रात ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की.कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये दुपारच्या सुमारासं नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना दिसून आले संबंधित नागरिकांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या कापडात अंदाजे ५ ते ६ वर्षीय मुलाचा गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे समजले.त्यानंतर चलबिचल झालेल्या नागरिकांनी कोपरगाव तालुका पोलिसांना दूरध्वनी वरून या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेतला आहे.घटनेची गांभीर्याने दखल घेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट दिली असून तपासाचे चक्र वेगाने फिरवले आहे घटणेबाबत पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

घटनेचा सुगावा मिळावा यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे.ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केले आहे. पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे.ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे !!

 

प्राथमिक तपासणी अवहालात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे निदर्शनास आले असून सदर बालकाची हत्या कोणी केली व का केली असेल..? हत्या कशासाठी व कोणत्या कारणास्तव केली..? नरबळीचा प्रकार तर नसेल ना?अश्या चर्चाना उधान आले असून अनेक प्रश्न घटनेमुळे उपस्थित झाले आहे सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, ज्यातून पुढील तथ्ये उघड होण्याची शक्यता आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!