
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-राहुल राजळे
सोनई-जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख यांनी सक्रिय राजकारणाबरोबरच समृद्ध साहित्य लेखन केले
त्यांचे अर्धविराम हे आत्मचारित्र साहित्य क्षेत्रात एक
मापदंड झाले असुन हे पुस्तक मराठीसह,हिंदी, इंग्रजी भाषेत सुद्धा असुन याच्या अनेक आवृत्या प्रसिध्द झाल्या असुन सर्वसामान्य वाचकांपासून जगभरातील साहित्यप्रेमींना याची भुरळ पडली आहे.
अर्धविराम या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन ३० मार्च २००७ रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या हस्ते दिल्लीत संपन्न झाले होते.यावेळी राजकारणात राहून देखील माजी खा यशवंतराव गडाख यांनी विपुल साहित्य लेखन केले याबद्दल डॉ.मनमोहनसिंग यांनी गौरवउद्गार काढले होते.पंतप्रधान पदावर असलेला व्यक्तीने मोठ्या व्यस्ततेतुन वेळ काढून साहित्यप्रति असलेली आपली रुची दाखवत पुस्तक प्रकाशन केले व पुस्तकाचे वाचन देखील करणार असल्याचे आवर्जून सांगितले होते व पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थितांशी आपुलीकने संवाद करून सर्वांची ख्याली खुशाली विचारली व मोलाचे मार्गदर्शन केले.
यामुळे आम्ही सर्व भारावून गेले असल्याचे माजी खा.गडाख यांनी सांगितले.याप्रसंगी तत्कालीन केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे,तत्कालीन मंत्री पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री शंकरराव गडाख, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख,लेखक व प्रकाशक अरुण शेवते,आदी उपस्थित होते.जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ,केंद्रीय अर्थमंत्री, सलग दहा वर्षे पंतप्रधान असलेले स्व डॉ मनमोहन सिंग यांच्या यांच्या जाण्याने एक शांत संयमी मार्गदर्शक, मोठ्या आत्मीयतेने सर्व स्तरातील नागरिकांशी गमावला संवाद साधरणारा निगर्वी व्यक्तीमत्व आज गमावले असल्याचे जेष्ठ साहित्यीक माजी खा यशवंतराव गडाख यांनी सांगीतले तसेच सन १९९१ मध्ये डॉ.मनमोहन सिंग राज्यसभेचे खासदार व तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री होते तेव्हा खासदार म्हणूनही डॉ.मनमोहन सिंग यांचे काम जवळून अनुभवता आल्याचे सांगत माजी खा यशवंतराव गडाख यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.
