प्रशासकीयराजकीय

महाराष्ट्र राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर अधिवेशनाला रवाना होण्यापुर्वी ना.विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे घेतले महादेवाचे दर्शन !!

प्रतिनिधी-वैभव ताजणे

आश्वी-महाराष्ट्र राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे. जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे प्राधान्य असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नागपूर अधिवेशनासाठी रवाना होण्यापुर्वी ना. विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे महादेवाचे दर्शन याप्रसंगी आमदार अमोल खताळ, तहसिलदार धीरज मांढरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना ना. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील जनतेन महायुतीला मोठा प्रतिसाद दिला. याचे एकमेव कारण म्हणजे मागील अडीच वर्षात सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतर राज्याला पुढे कसे घेवून जायचे याबबात निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आरखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तोच आमचा प्राधान्यक्रम भविष्यात असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नवे उद्योग आणून युवकांना रोजगार निर्माण करून देणे हा माझा प्राधान्यक्रम असणार आहे. यासाठी जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला यंदा तिनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारायचे हे उद्दीष्ट्य पूर्ण करायचे असून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने स्मारक उभारले जाणार असून त्याचा आराखडा तयार कराण्यात येणार श्री.क्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी, गोदावरी कालव्याचे नूतनीकरण आणि निळवंडे कालव्याचे राहीलेले काम पूर्णत्वास नेणे हाच आपला पुढील काही दिवसांचा यांनी असेल असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महीलांच्या अर्जाची पडताळणी कुठेही सुरू नसल्याचे स्पष्ट करून महायुतीने जाहीरनाम्यात या योजनेचे अनुदान २१०० रुपये करण्याची ग्वाही दिली त्याची पूर्तता निश्चीत होईल.:- अमोल खताळ पाटील आमदार,संगमनेर विधानसभा

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!