धार्मिक

धार्मिक कार्य धर्माचे वैभव आहे – अणिताताई जाधव

श्रध्दा प्रतिष्ठानचे साईरत्न पुरस्कार माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि ग्रामिण साहीत्यिक कवी यशवंत पुलाटे यांना जाहीर

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

लोणी (ता.२९) – युवा शक्तीला दिशा दिली तर हीच युवाशक्ती सक्षम राष्ट्र निर्माण करू शकते धार्मिक कार्य धर्माचे वैभव आहे. साईभद्धा ग्राम‌प्रतिष्ठानच्या व्यासपीठातून सशक्त युवा शक्ती उभी राहात असून समाजाने या युवकांच्या पाठीशी उभे राहावे असे प्रतिपादन ह.भ.प. अनिताताई जाधव यांनी केले.दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथे नववर्षानिमित्त आयोजित केलेल्या साईसत्‌चरित्र पारायण सोहळा आणि नारी शक्ती सन्मान सोहळा २०२४ अंतर्गत महिला किर्तन महोत्सवात त्या बोलत होत्या. 

यावेळी भाविकांना प्रबोधन करतांना अनिताताई जाधव म्हणाल्या,अध्यात्मिक महाजागरातून युवा शक्तीने एकात्मता, बंधू-भाव, राष्ट्रप्रेम, समाजसेवेचा नवा आदर्श दिला. असे सांगून दाढ बुद्रुक हे गांव प्रतिपंढरपूर असल्याचा उल्लेख करतांनाच सामाजिक कार्यात येथील युवकांचा आदर्श दिशादर्शक आणि इतरांना प्रेरणा देणारा असाचं आहे. अनेक वर्षाची परंपरा येथील युवक आज ही पुढे नेल आहेत. आज जीवनशैली बदलत असताना तरुणाई हायटेक झाली पण धार्मिक कार्याबरोबरंच समाज प्रबोधन, समाजजागृती, ग्रामीण विकासात तरुणांचे योगदान वाढत असून श्रध्दा ग्राम प्रतिष्ठानचा हा उपक्रम गावोगावी गेल्यास युवा सक्षम राष्ट्र निर्माण होईल असे ही सांगितले. 

 यावेळी श्रध्दा ग्रामविकास प्रतिष्ठाने योगेश तांबे म्हणाले स्वर्गीय डॉ. अशोकराव तांबे यांनी सुरु केलेला हा आगळा-वेगळा सोहळा येथील श्रध्दा ग्राम प्रतिष्ठान सक्षमपणे पुढे नेत आहे. १५ वर्षापासून अखंड सुरु आहे. गावचे सहकार्य यामुळे प्रवरेसाठी हा आदर्श असल्याचे सांगून युवकांनी ग्रामविकास सक्रीय होऊन गावातील गावचे गावपण टिकविण्याचे आवाहन करत बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी या उपक्रमाची सांगतास्वरभास्कर ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे काल्याचे किर्तन होणार असून यानिमित्ताने सामाजिक,सहकार,शिक्षण आणि ग्रामीण विकासात योगदान देणारे जेष्ठ मार्गदर्शक आणि माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि ग्रामीण भागामध्ये साहित्य क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक उपक्रम राबवणारे प्रवरा शब्दस्नेही व्यासपीठाचे संस्थापक ज्येष्ठ कवी यशवंत पुलाटे यांना साई रत्न पुरस्कार यानिमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान केले जाणार असल्याचेही योगेश तांबे यांनी सांगितले.यासाठी लोकनियुक्त सरपंच तात्यासाहेब सातपुते, रविद्र वाणी, अन्नदानाच्या नियोजनासाठी रवींद्र बनसोडे यांचेसह परिसरांतील युवकांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.

 

 

 “युवकांना बरोबर घेऊन काम केले तर मोठे काम उभे राहू शकते. युवकामध्ये मोठी ताकद आहे. अन्नदान असो की गावातील धार्मिक, सामाजिक उपक्रम असो यामध्ये युवकांचा सहभाग मोठा असतो. “सबका मालिक है एक है ही शिकवण साईबाबांनी दिली.शनीवारी या ठिकाणी पाऊस झाला परंतु तरुणाईने अशा संकटातही आपले योगदान देत महाप्रसादांचे नियोजन करत वेगळा आदर्श निर्माण केला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!