कृषी

प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून हायड्रोपोनिक युनिटचा प्रयोग यशस्वी  

विना माती भाजीपाला शेतीचा यशस्वी प्रयोग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्थेअंतर्गत असणाऱ्या लोणी येथील कृषी जैवतंत्रज्ञान व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक यांचा सुरेख संगम साधत मातीविना पिके उगवण्याची “हायड्रोपोनिक युनिट” ची स्थापना करत या युनिटच्या माध्यमातून पालेभाज्यांची विना मातीची शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

 

 संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेत ‘ शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञाना पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असावे म्हणजे विद्यार्थी सैद्धांतिक नव्हे तर व्यवहारिक शिक्षण घेतील’ या उद्देशाने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हे युनिट सुरू करण्यात आले. प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या युनिटच्या माध्यमातून केवळ विज्ञानाचेच नव्हे तर व्यवस्थापन, जबाबदारी आणि संघटनेचेही धडे शिकत आहे. हायड्रोपोनिक युनिट मधून सध्या हे विद्यार्थी पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, हिरवा माठ, आंबट चुका, करडई इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करून नियमित निरीक्षण आणि नोंदी ठेवून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.  

 

 

हायड्रोपोनिक तंत्रज्ञान ही एक आधुनिक व पर्यावरणपूरक शेती पद्धत आहे, ज्यामध्ये मातीशिवाय वनस्पतींची लागवड केली जाते. या पद्धतीत झाडांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये व पाणी थेट मुळांपर्यंत पोचवले जाते. बियाण्यांची उगम प्रक्रिया कोकोपीट किंवा वर्मीकंपोस्ट मध्ये केली जाते.आवश्यकता असल्यास खते पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण थेट मुळांपर्यंत दिले जाते.

 

हायड्रोपोनिक पद्धतीने पालेभाज्यांसाठी साधारणतः २५ ते ३५ दिवस, फळभाज्यांसाठी ६० ते ९० दिवस, तर औषधी व इतर वनस्पतींसाठी ४५ ते ७० दिवसांचा कालावधी लागतो. या पद्धतीचे मुख्य फायदे म्हणजे नव्वद टक्के पाण्याची बचत, मातीची गरज नसणे, कीटकनाशकांचा कमी वापर, जलद वाढ आणि उच्च दर्जाचे उत्पादन मिळणे. त्यामुळे शहरी भागात व मर्यादित जागेत शेती करण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून त्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ असे युनिट तयार करुन यशस्वी शेतीचे जुगाड केले.सदर प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ.निलेश दळे , डॉ. आशिष क्षीरसागर, समन्वयक प्रा.सारिका फरगडे, प्रा.स्वरांजली गाढे, डॉ.परिमल विखे,डॉ. महेश जगदाळे, डॉ.अमोल सावंत, डॉ.स्वप्नील नलगे, डॉ.सरिता साबळे व इतर सर्व प्राध्यापक वृंद आदींचे सहकार्य लाभत आहे.   

 

 प्रवरा कृषी शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी हा केवळ शेतीच्या पुस्तकी ज्ञानातच पुढे न राहता त्याला प्रात्यक्षिकातून प्रत्यक्ष शेतीचा अनुभव यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरती वेगवेगळे प्रयोग हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू आहेत या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडवण्याबरोबरच प्रवरेचा विद्यार्थी हा भविष्यात नोकरीबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायातूनही पुढे कसा जाईल हाच प्रवरेचा मानस राहिला आहे यामुळे अनेक प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता ही सिद्ध करत आहे. – डाॅ.उत्तमराव कदम

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!