
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – सहकार महर्षी दिवंगत शंकरराव कोल्हे यांचे नेतृत्व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे होते त्यांनी समाजकारणातुन आगळीवेगळी ओळख निर्माण केली त्यांनी सहकार क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठे पाठबळ मिळाले आहे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे गणेश परिसराचा शत प्रतिशत विकास होत असून. सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कायम लढा दिला आहे स्व.शंकरराव कोल्हे यांचे कार्यकर्तृत्व खुप मोठे असल्याचे प्रतिपादन प्रकाश आरणे यांनी केले.
राहाता तालुक्यातील चितळीगाव येथे माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांचे पुण्यस्मरण व प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी समस्त प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करण्यात येवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी चितळीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम,बाळासाहेब वाघ,उद्धवराव साबळे,विक्रम वाघ छबुराव खरात संपतराव वाघ विजय पठारे,रमेश तनपुरे, राजेंद्र वाणी, शिवाजीराव पगारे,नंदू आरने,राजेंद्र कुऱ्हाडे,अजय कुऱ्हाडे, बबलू पगारे,जयवंतराव टर्ले,सुभाष तनपुरे,सागर वाघ,बाळासाहेब आरणे, आदींसह चितळी परिसरातील सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
