
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-वैभव ताजणे
आश्वी- सावित्रीबाई फुले या पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका,मुख्याध्यापिका होत्या. ज्ञानदान करताना त्याना अनेक अडचणी आल्या मात्र दिन दलित,क्षद्रांकरीता शिक्षणाचा प्रवास त्यांनी थांबविला नाही.त्यांनी केलेला संर्घष मय महिलांचा प्रवास राहिला आहे यामुळे आज महिलांना सामाजामध्ये योग्य वागणुक मिळत असल्याचा विश्वास प्राथमिक शिक्षिका लता बिडवे यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील जिल्हा परीषद प्राथमिक मुलींच्या शाळेमध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी मुलीनी सावित्रीबाई फुले यांचा सारखा पोक्षाक परीधान केला होता. तसेच विद्यार्थीची भाषणे झाली. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब गिते,संगिता क्षिरसागर, लता बिडवे, रंजना गिते सह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
पुढे बोलताना लता बिडवे, म्हणाल्या की,सावित्रीबाईंना भारतीय स्त्री वादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे.
“अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले.पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली असल्याचे संगिता क्षिरसागर यांनी सांगितले.
