
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-वैभव ताजणे
आश्वी:(ता.२७) – श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी २२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूर श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. “मी नृसिंह भान असून श्री शैलम् जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले असल्याचे ज्येष्ठ सेवेकरी लक्ष्मण होडगर गुरूजी यांनी सांगितले.
श्री.स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व बाल संस्कार केद्र आश्वी बु येथील ग्रामअभियान आरती अर्तगंत ज्येष्ठ सेवेकरी लक्ष्मण होडगर गुरुजी यांच्या वस्तीवर आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड, सोसायटी चेअरमन आण्णासाहेब जऱ्हाड, माजी उपसरपंच नामदेव होडगर, विनायक जऱ्हाड, तान्हाजी गायकवाड, दत्तात्रय होडगर, मयुर वाडेकर, अभिषेक ताजणे, मंगेश निघुते, तुषार ताजणे, एकनाथ खेमनर, सगार लाहोटी पत्रकार वैभव ताजणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना होडगर गुरूजी म्हणाले की श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःख मुक्त करून कार्यरत केले. पिठले महाराज यांनी अनेक वर्षा स्वामी सेवा केली त्याचा वारसा पुढे मोरे दादा यांनी सुरू ठेवला.पुढे जात मोरे दादा यांच्या मार्गदर्शना खाली गरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी आध्यात्म व विज्ञानांची सांगड घालत सेवेकऱ्यांच्या विविध प्रश्नाच्या समस्या सोडवत मार्गदर्शन करत आहे.
वयाच्या ६५ व्या वर्षी वडील चांदेव निघुते यांच्या हृदयाचे बायपास शस्त्रकिया करण्यात आली.अनेक अडचणी शस्त्रकिया करयांना होत्या परंतु श्री स्वामी समर्थची सेवा व गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे आध्यात्मिक मार्गदर्शना मुळेच आपरेशन हे उत्तम झाले. डॉक्टराच्या रूपाने स्वामीनी ऑपरेशन केल्याची प्रचित्री आम्हा निघुते परीवारास आली. – मंगेश निघुते,सेवेकरी,आश्वी.बु
