
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
पुणतांबा – सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून पुणतांबा येथे दोन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले असतानाही गावाला नेहमीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून पाणी योजनेच्या या कामात अनेक त्रुटी असून पाणीपुरवठा मंत्र्यांनी योजनेच्या चौकशीची आदेश देऊ नये चौकशीची काय झाले यासाठी सर्वपक्षीय शिष्ट मंडळाच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात ठिय्या देण्यात येणार असल्याचे पुणतांबा गावात झालेल्या ग्रामसभेत ठरविण्यात आले तसेच स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमण आदी विषयावर ग्रामसभेत वादळी चर्चा झाली पाणी योजनेच्या मुद्द्यावरून एकमेकात आरोप प्रत्यारोप झाले.
यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पवार होत्या या ग्रामसभेत ग्रामपंचायतचे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते सुमारे 33 कोटी रुपये खर्च करून दोन पाणी योजना पुणतांब्याला मिळाल्या असल्या तरी गावातील पाणी प्रश्न सुटला नाही योजनेतील अनेक त्रुटी डीपीआर बाबत जीवन प्राधिकरणाकडे तक्रार करून देखील पाणी योजनेची वाटोळे झाले आहे कोट्यवधींचा निधी र पाण्यात गेला काय असा प्रश्न उपस्थित करून प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ धनंजय धनवटे शिवसेनेचे सुहास वहाडणे मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश जाधव सुनील थोरात यांनी उपस्थित करून जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले व जाब विचारला जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत १६ कोटी रुपयाच्या पाणी योजनेत अनेक त्रुटी निकृष्ट दर्जाचे काम झाले त्याची चौकशी करण्यात आली मात्र त्याचा अहवाल अद्याप ग्रामस्थांना मिळाला नाही त्यातच जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या १७ कोटी रुपयांच्या पाणी योजनेत अनेक त्रुटी असून अपूर्ण काम वाड्यावर पाईपलाईन पोहोचली नाही जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम संथ गतीने सुरू आहे यामुळे ग्रामस्थांना गढूळ पाणी मिळत आहे आदी प्रश्नावरून जाब विचारून जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले प्रश्नांची सरबत्ती केली डॉ. धनंजय धनवटे व ग्रामपंचायत यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून देखील गावाचा पाणी प्रश्न सुटू शकत नाही याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून या योजनेची चौकशी झाली पाहिजे असा ठराव मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सर्व पक्ष शिष्टमंडळ जाऊन विचारणा करणार असल्याचे सांगण्यात आले ठेकेदाराबाबत देखील अनेक तक्रारी असून या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे पूर्ण पाणी योजना झाल्याशिवाय ग्रामपंचायत कडे हस्तांतर करू नये असा ठराव घेण्यात आला विकास आघाडीचे धनंजय जाधव व चंद्रकांत वाटेकर यांनी माहिती विशद केली माहितीवर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.
पुणतांबा वीज वितरण कंपनीच्या कारभाराला शेतकरी व ग्रामस्थ वैतागले असून आठ तास शेतकऱ्यांना वीज द्यावी असा निर्णय झाला असताना पुणतांब्यात सहा तास वीज मिळते त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले असून पिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आठ तास वीज द्यावी अन्यथा पालकमंत्री खासदार व आमदार यांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल व वीज वितरण कार्यालयावर धडक आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी दिला या ठरावास शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला.
स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे वाढले असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून अनेक व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अडवला आहे स्टेशन रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी दिलीप डंबाळे यांनी केली यावर सार्वजनिक बांध विभागाला पत्र देऊन कार्यवाही करणार असल्याचे सरपंच पवार व उपसरपंच निकिता जाधव यांनी सांगितले.
बजरंग दलाचे कार्यकर्ते व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक..
“गेल्या चार दिवसांपूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयावरून गाईंनी भरलेला टेम्पो अडवला होता त्यावरून बजरंग दलाचे कार्यकर्ते व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती याबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यात आला सहाय्यक फौजदार दिलीप मंडलिक यांनी कायदेशीर कारवाई व्यापाऱ्यावर करण्यात आली असून संबंधित जनावरे कत्तल खाण्याकडे जाणारी नव्हती असे सांगितले मात्र समाधान न झाल्याने बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचाऱ्यात यावरून शाब्दिक चकमक झाली धनंजय जाधव व सदाशिव वाहाटुळे यांनी मध्यस्थी करीत या वादावर पडदा टाकला शिवस्मारकासाठी जागेची निश्चिती करावी वाचनालय सुरू करावे आधी प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी प्रश्न मांडले यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामपंचायत सदस्य अनिल नळे रामचंद्र पवार सुनील कुलट भास्कर मोटकर सुनील थोरात बाळासाहेब चव्हाण आबासाहेब नळे दादा सांबारे रमेश जाधव संजय धनवटे अनिल पेटकर गणेश बनकर संदीप वाहडणे यांनी भाग घेतला.
वीज प्रश्नी शेतकरी आक्रमक
यावर्षी गोदावरी नदी व विहिरींना मुबलक पाणी असून खरीप पिके ही जोमदार असताना आठ तास वीज मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत याबाबत लवकर निर्णय न झाल्यास थेट लोकप्रतिनिधीच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
