
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पुणतांबा – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी सकाळी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत पुणतांबा येथे बजरंग दल व श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने निदर्शने करण्यात आले.
यावेळी सकल हिंदू समाजाच्या उपस्थितीत हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर परिसरात दहशतवादविरोधी घोषणा देण्यात येवून निषेध व्यक्त करण्यात आला.
या निदर्शनादरम्यान आंदोलकांनी “दहशतवादाचा नायनाट झाला पाहिजे”, “भारत माता की जय”, “दहशतवाद मुर्दाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा दिल्या. पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.सरकारने या दहशतवादी घटकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि देशाच्या सुरक्षेसाठी जनतेने एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले.या आंदोलनात बजरंगदल,पुणतांबा श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
