
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क )
चितळी – राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितळीगाव शाळेला नुकताच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत २०२४-२५ वर्षात झालेल्या शालेय परसबाग स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला असून.आनंदाची बाब म्हणजे २०२४-२५ वर्षात राहाता तालुका परसबाग स्पर्धेमध्ये चितळीगाव शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.शालेय परसबाग स्पर्धेत नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकविण्याचा मान देखील चितळीगाव शाळेला मिळाला आहे या कौतुकास्पद कामगिरीमुळे चितळीगाव जी.प शाळेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे.
मुख्याध्यापक विश्र्वास टपळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात अतिशय नियोजनबद्ध व कल्पकतेने सर्व शिक्षकांच्यासह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीतून व योगदानातून सुंदर परसबाग फुलवण्यात यश आले आहे.परसबागेत मेथी,पालक,भेंडी, वांगी, भोपळा, कांदा, लसूण, वाल, शेवगा,कोथिंबीर, आळू आदी भाजीपाला पिके घेतली जात आहेतयांचबरोबर पपई, पेरू, चिंच, लिंबोणी, केळी आदी फळ झाडाच्यासह आयुर्वेदिक तुळस, कोरफड, अडुळसा, आवळा, हळद आदी वन औषधांची लागवड करण्यात आली आहे.
संपूर्ण परसबागेत सेंद्रिय खतांचा वापर करण्यात येतो यामुळे सर्वच भाजीपाला पिके फळ पिके हे सेंद्रिय खतामुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाढतात. परसबागेत रासायनिक खतांचा वापर केला जात नाही.सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे परसबागेतील सर्वच फळझाडे भाजीपाला पिके अतिशय जोमात वाढली आहेत.ईयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतचे चिमुकले विद्यार्थी नियमित त्या परसबागेमध्ये जातात त्या परत बागेची निगा ठेवतात वृक्षांना पाणी देतात, एवढेच नव्हे तर शिक्षकांना त्या परसबागेतील फळभाज्या हार्वेस्ट करण्यासाठी मदत करतात.परसबागेत सर्वच भाजीपाला व फळ पिकांना पाणी देण्यासाठी पारंपारिक सिंचनासह आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात येतो यामुळे कमी पाण्यातही सर्व भाजीपाला पिके अगदी पद्धतशीर व जोमाने वाढतात यामध्ये मुख्यत्वे रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा वापरही केला जात आहे.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा समावेश विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार योजनेतील भोजनात केला जात आहे. त्यामुळे परसबागेतील ताजा तोडलेला भाजीपाला हा लगेच शाळेच्या किचनमध्ये जातो व त्या भाजीपाल्यापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार बनवून तोच विद्यार्थ्यांना खाण्यासाठी दिला जातो.नुकतीच या परसबागेची शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा अधिक्षक रुपेश भालेराव व कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रत्यक्ष येवून पाहणी केली यावेळी परसबागेच्या पाहणीचा अहवाल सादर करण्यात येवून यामध्ये जी.पशाळेला जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळाला आहे.तालुका गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, शालेय पोषण आहार योजना अधीक्षक,विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकरश्रीमती चंदा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या या यशाबदल लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम,उपसरपंच कविताताई पगारे,ॲड.अशोकराव वाघ, विलासराव वाघ, सोपानराव वाघ, श्री. विक्रम वाघ, श्री. दिपक वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे निळकंठ वाघ, कैलास वाघ, पत्रकार,अशोक वाणी प्रियांका गायकवाड परसबागेचे उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी शिक्षक विश्र्वास चोखर, संजय आग्रे, दिपक अहिरे, श्रीमती सुजाता लांबाटे, सचिन विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले. चितळी गाव व स्टेशन परिसरातील समस्त माता-पालक यांनी अभिनंदन केले आहे.
