
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सिन्नर नाशिक येथील सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांची इन्फोसिस, टी. सी. एस, कॉग्निझंट, ग्रोविंग फ्लॉवर्स, एपिटोम आणि लीग्रॅड अशा विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली असून या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्याना पाच लाखपासून ते साडे तीन लाखांचे सरासरी पॅकेज सर्वच विद्यार्थ्यांना मिळाले आहे.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश शिंदे, प्लेसमेंट विभागाचे प्रा. राहुल सोनटक्के, प्रा. ऋषीकेश भालेराव तसेच सी.इ.ओ. सेक्रेटरी डॉ. राणा महाजन तसेच सर्व विभागप्रमुख आणि सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना डाॅ.सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या की प्रवरेच्या माध्यमातून सहकारातून समृद्धीकडे हा संदेश आपण घेऊन जावा व सहकाराच्या माध्यमातून झालेले परिवर्तन हे आपण इतरांना सांगावे तसेच प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराची ही निर्मिती केली जाते.
पुढे त्या म्हणाल्या विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये मोठी यश प्राप्ती करा परंतु प्रवरेचे नाव हे उंच पदावरती कसे जाईल यासाठी नेहेमी प्रयत्नशील रहा, प्रवरा परिवार कायमच आपल्या सोबत राहील असेही आश्वासित केले. संस्थेच्या माध्यमातून सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्यामुळेच मोठी प्लेसमेंट सिन्नर एस व्ही आय टी इंजिनियरिंग कॉलेजने केली आहे. प्रवरेचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असावा आणि त्याला जागतिक पातळीचे ज्ञान मिळावे यासाठी प्रवरा कायमच प्रयत्नशील आहे. आपण जीवनात मोठे व्हा. प्रवरा शैक्षणिक संकुलाला आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत रहा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रारंभी प्राचार्य डॉ.गणेश शिदे यांनी सन २०२४- २५ या कालावधीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा परिचय करून देत असताना विद्यार्थ्यांची प्लेसमेंट व्हावी या उद्देशाने महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या अनेक उपक्रमांची माहिती दिली तसेच संस्थेचे अध्यक्ष मंत्री विखे पाटील यांनी वेळोवेळी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देत असतानाच संस्थेच्या माध्यमातून नोकरी करणारा आणि नोकरी उपलब्ध करून देणारा विद्यार्थी घडावा यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. तसेच महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम हे सुरू असतात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.
माजी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन महाविद्यालयाने बनवले आहे. या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारे बदल हे विद्यार्थ्यांना विविध परिसंवादाच्या माध्यमातून तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून दिली जाते त्याच बरोर संवाद कौशल्य, प्रक्षेत्र भेटी, विविध तज्ञांचे मार्गदर्शन तसेच बद्दलते औद्योगिक तंत्रज्ञान या विषयाचे परिसंवाद आणि चर्चासत्रे या माध्यमातून एक परिपूर्ण विद्यार्थी हा ग्रामीण भागातून निर्माण होत आहे. यामुळेच आज महाविद्यालयाने दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा.डाॅ.सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे,संस्थेचे प्लेसमेंटचे समन्वयक प्रा.मनोज परजणे यांनी अभिनंदन केले आहे.
नाशिकसह सिन्नर परिसरांतील सामान्य जनतेच्या मुलांना शिक्षण देण्यात सिंध्दु छाया कॅम्प हा शिक्षण क्षेञात अव्वल स्थानावर पोहचत आहे. संस्थेचा विद्यार्थी हा शिक्षणांतून आत्मनिर्भर व्हावा.बदलत्या तंञज्ञानातून तो सक्षम घडावा.नोकरी सोबत तो नोकरी देणारा ठरावा यासाठी विशेष प्रयत्न येथे होत आहेत.आज या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्याने मोठे समाधान या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होते.
