राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीरलोणीशैक्षणिकसामाजिक

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा विकास होवून उद्याचे जबाबदार नागरीक घडणार आहे – ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर चौधरी 

पुणतांबा महाविद्यालयाचा विशेष श्रमसंस्कार शिबिराचा मौजे जळगाव येथे समारोप समारंभ संपन्न

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

राहाता – प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गुरुजनांचा व वडीलधाऱ्यांचा आई-वडिलांचा आदर करावा शालेय जीवन जगताना राष्ट्रच्या भारत देशाच्या प्रती प्रत्येकाने आदर बाळगावा आपण एकमेकांशी आपुलकीने वागणं एकमेकांना सहकार्य करणं याचबरोबर जनहिताचे कामे करणे अशा अनेक गोष्टी रा.से.यो शिबिरातून शिकता येतात या गोष्टींचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करावा भविष्यात विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होणे अतिशय गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी समाजातून चांगल्या गोष्टी शिकव्यात थोर मोठ्यांचा आदर्श प्रत्येकाने मनाशी बाळगला पाहिजे समाज सेवा करणे सामाजिक दातृत्व जपणं हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश्य आहे राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा विकास होवून उद्याचे जबाबदार नागरीक घडणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर भिवाजी चौधरी यांनी केले.

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत व प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पुणतांबा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव (ता.राहाता) येथे (दि. १५ ते २१) जानेवारीच्या दरम्यान “विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२४-२०२५” चे आयोजन करण्यात आले होते.मंगळवार, (दि.२१) जानेवारी रोजी सकाळी जळगाव (ता.राहाता) येथे शिबिराचा समारोप समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष,गंगाधर भिवाजी चौधरी, होते व्यासपीठावर श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव नाथाजी चौधरी, ज्येष्ठ मार्गदर्शक आण्णासाहेब सयाराम चौधरी,अंकुश वाघ,गोरक्षनाथ चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

यावेळी महाविद्यालयीन विकास समिती सदस्य डॉ धनंजय धनवटे पाटील यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.सध्याचा विद्यार्थी हा भविष्याचा नागरिक असून, त्याला श्रमसंस्कार आणि दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते, युवकांनी ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता करावी असे आवाहन केले.चांगदेवनगर येथील युवा नेते व प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब भोरकडे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांनी स्वनिधीतून जळगाव मध्ये आलेल्या सर्व शिबिरार्थी स्वयंसेवकांना दातृत्वाच्या भावनेतुन स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करून दिली मागील तीन वर्षापासून जळगावचे ज्येष्ठ नेते संपतराव चौधरी यांनी भोजनाची व्यवस्था करून देत आहेत नेहमीच सर्व स्वयंसेवकांना सहकार्य करतात.यावेळी विद्यार्थी कु.साक्षी फोपसे, प्रगती राऊत, नेहा वहाडणे, अथर्व सांबारे, प्रसाद म्हसे,प्रवीण दरंदले यांनी शिबिरात आलेले अनुभव सांगुन मनोगत व्यक्त केले.

 

शिबिरात एकूण ७५ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आणि पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.सय्यद ए.एस यांनी केले, शिबिर काळात केलेल्या कामाचा अहवालाचे वाचन व प्रस्तविक एनएसएस शिबिराचे कार्यक्रम आधिकारी प्रा.डॉ.शिंदे एस एस यांनी केले.प्रा.बाबासाहेब म्हसे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व प्रा. कु.शामा धनवटे, कु.प्रनोती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थी विकास अधिकारी नंदू सदाफळ, प्रा.तेजस्विनी पवार, प्रा.सिमा दळवी, प्रा.माधुरी मोकळ,शिपाई पोपट पगारे सर्व विद्यार्थी,महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, जळगाव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.या शिबिराचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील संस्थेच्या अध्यक्षा मा.शालिनीताई विखे पाटील, सचिव मिराताई काकडे,कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी कौतुक केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!