कृषी विज्ञान केंद्र

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा शेतक-यांनी लाभ ध्यावा – शैलेश देशमुख

बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्रात प्रशिक्षण संपन्न 

( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या शेतकऱ्यांनी समजून घेत असताना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सुक्ष्म अन्न प्रक्रीया उदयोगांना बँक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या दहा लाख मर्यादेत ३५ टक्के कृषी विभाग यासाठी अनुदान मिळते. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन उद्योग क्षेत्रामध्ये शेती उद्योग क्षेत्रामध्ये पुढे जावे असे आवाहन असे बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ देशमुख यांनी केले.

 

कृषि विज्ञान केंद्र,बाभळेश्वर अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांविषयी तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित प्रशिक्षणात देशमुख बोलत होते,.यावेळी के के मॅनेजमेंट सोल्युशेन उद्योजकता केंद्राचे कमलेश कोते,केंद्राचे शास्ञज्ञ शांताराम सोनवणे,भरत दंवगे,डाॅ.विठ्ठल विखे, डॉ. विलास घुले डॉ.प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे,कैलास लोढे आदीसह परिसरांतील शेतकरी उपस्थित होते. 

 

यावेळी मार्गदर्शन करतांना देशमुख म्हणाले जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आणि विविध यंत्रणेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी केंद्राचे विशेष प्रयत्न हे सुरू आहेत. या प्रशिक्षणांतून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी बरोबरच युवक युवतींनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना समजून घेत या माध्यमातून आपण व्यवसायाकडे वळावे असे सांगत यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.पशु विज्ञान विभागाचे डॉ.विठ्ठल विखे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे असे सांगितले. गृह विज्ञान विभागाच्या सज्जला लांडगे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रक्रियायुक्त पदार्थांचे पॅकेजिंग, साठवण क्षमता वाढीचे पर्याय यावर मार्गदर्शन केले. 

 

डॉ. विलास घुले यांनी भाजीपाला प्रक्रिया व मुल्यवर्धन त्यामध्ये भाजीपाला सुकविणे, फळप्रक्रिया यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण तज्ञ कमलेश कोते यांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे कौशल्य, आवश्यक परवाने, त्याला लागणारी कागदपत्रे, क्षमता बांधणी, व्यवसायाच्या निगडीत महत्वाचे मुद्दे त्यामध्ये उत्पादित मालाचे ब्रँडिंग,मार्केटिंग, पॅकेजिंग, लेबलिंग यांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर प्रियंका खर्डे यांनी केले. 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!