बिबट्याचा हल्ला

चितळी परिसरात बिबट्याची दहशत संपेना.! आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्याने मुलीसह नागरिकांवर हल्ला करून गंभीर जखमी केले 

बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे अन्यथा उपोषणाचा पर्याय अवलंबवणार!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

चितळी: (ता.२२) -परिसरामध्ये बिबट्याने रस्त्यावरून घरी जात असलेल्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना (ता.२२) रोजी चितळी (ता.राहाता) परिसरातील बी.जे साळुंखे पेट्रोल पंपाच्या लगतच नुकतीच घडली आहे.

घडलेली सविस्तर घटना अशी की, सिद्धी विकास वाघ (वय.१५) ही  बी.जे साळुंखे पेट्रोल पंपाच्या शेजारील असलेल्या रस्त्यावरून घरी जात असताना याचवेळी मकाच्या शेतातुन बाहेर आलेल्या बिबट्याने थेट रस्त्यावर येऊन तिच्यासमोर मोठे डरकाळी फोडली व साक्षी वाघ हिच्यावर अचानकपणे हल्ला केला या हल्ल्यात पायाच्या पोटरीवर पंजा मारून गंभीर जखमी केलेले आहे तिला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आलेले आहे.याच दरम्यान बी.जे साळुंखे पेट्रोल पंपाच्या जवळून चितळी गावात जात असलेल्या संभाजी तनपुरे, नितीन तनपुरे, संदीप वाघ, यांच्यावर देखील याच बिबट्याने हल्ला केला आहे ही घटना घडल्यानंतर चितळी परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा ठार करावे अशी मागणी नागरिकांनी वनविभागला केली आहे.

 

ही घटना घडल्यावर काहीच वेळेत या मार्गांवरून चितळी गावात जात असलेल्या बाळासाहेब वाघ यांच्या मोटरसायकली वरती बिबट्याने झेप घेवून हल्ला चढवला मोटरसायकलचा पाठलाग केला बिबट्याच्या हल्लाच्या दरम्यान बाळासाहेब भास्कर वाघ हे आपल्या मोटरसायकलवर होते यादरम्यान बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलीला धडक दिली यावेळी त्यांचा मोटरसायकल चालवताना अचानक ताबा सुटला व अपघात झाला असून या घटनेमध्ये बाळासाहेब वाघ यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे त्यांना उपचारासाठी तात्काळ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे परंतु अजूनही बिबट्याचे भय संपलेले नाही.बिबट्या बी.जे साळुंखे पेट्रोल पंपाच्या जवळील मकाच्या शेतामध्ये लपून बसला असून सदर मादी बिबट्यासह दोन बछडे असून या बिबट्यांचा बचाव करण्यासाठी मादी बिबट रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांवरती हल्ला चढवत आहे.

या घटनेमुळे चितळी स्टेशन परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ग्रामस्थ खूप आक्रमक झाले असून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अनेकदा वनविभागाला निवेदन देऊन सुद्धा चितळी परिसरामधील मुक्त संचार करत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आलेले आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण चितळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ कोपरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या दालना समोर उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

 

घटनेच्या पार्श्वभूमीवर चितळी गावामध्ये वनविभागाच्या गलथान कारभाराविरोधात तीव्रप्रसाद उमटत असून मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच चितळी गावातील खंडोबा मंदिर परिसरात मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यानंतर पिंजरा लावूनही त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकत नसल्याने नागरिकांची भीती वाढली असून सायंकाळच्या वेळेला बाहेर पडण्यास नागरिक आता पूर्णपणे घाबरत आहेत चितळी स्टेशन परिसरातील बी.जे साळुंखे पेट्रोल पंपाच्या शेजारील मकाच्या शेतामध्ये बिबट्याचा मुक्त संचार होताना नागरिकांच्या निदर्शनास आलेले असून प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार एक मादी बीबट व दोन लहान बछडे असल्याचे नागरिकांनी सांगितलेले आहे या मादी बिबट्यासह बछड्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा असेेेे न झाल्यास उपोषण करणार असल्याचे चितळी गावचे लोकनियुक्त सरपंच नारायण कदम, सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी,दीपक वाघ,सोपान वाघ, सोनाजी पगारे, दत्ता साळुंखे,कैलास वाघ, शुभम कांबळे, ओंकार वाघ,शैलेश वाघ, प्रदीप चौधरी,विकास वाघ, आदी ग्रामस्थांनी सांगितलेले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!